एसपी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल गायकवाड यांची सेवानिवृत्ती
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या, मर्यादित संसाधनं व घरातील नाजूक आर्थिक परिस्थितीमधून पुढे आलेल्या या ध्येयवेड्या विद्यार्थ्याने/ शिक्षकाने स्वतःच्या कष्टाने, चिकाटीने आणि निखळ प्रामाणिकपणाने आपली वाटचाल घडवली. ज्या महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला, त्याच महाविद्यालयाचे प्राचार्य होणे हीच त्यांच्या आयुष्यातील महानता खूप काही सांगून जाते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विद्यार्थ्यांच्या मनात अमिट ठसा उमटवणारे सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे (Sir Parashuram College) प्राचार्य डाॅ. सुनील गायकवाड (Principal Dr. Sunil Gaikwad retired) हे आज ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना महाविद्यालयाच्या वतीने निरोप देण्यात आला यावेळी त्यांच्या सहकार्याकडून त्यांच्या ३६ वर्षाच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देण्यात आला. गायकवाड यांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक आणि प्रशासकीय कारकिर्दीची सेवानिवृत्ती स्वीकारली (Administrative retirement) आहे. हिंगणगाव सारख्या खेडेगावातून येऊन पुण्यासारख्या शिक्षण नगरीच्या शैक्षणिक शिखरापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास सर्वांसाठी आदर्श ठरणारा आहे.
महवितरण विद्युत सहाय्यक परीक्षेचा निकाल जाहीर
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या, मर्यादित संसाधनं व घरातील नाजूक आर्थिक परिस्थितीमधून पुढे आलेल्या या ध्येयवेड्या विद्यार्थ्याने/ शिक्षकाने स्वतःच्या कष्टाने, चिकाटीने आणि निखळ प्रामाणिकपणाने आपली वाटचाल घडवली. ज्या महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला, त्याच महाविद्यालयाचे प्राचार्य होणे हीच त्यांच्या आयुष्यातील महानता खूप काही सांगून जाते.
सुनील गायकवाड यांनी 36 वर्षांच्या अध्यापनकाळात विद्यार्थ्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण केली. 31 पीएच.डी., 20 एम.फिल. आणि 90 हून अधिक प्रबंध मार्गदर्शित करत त्यांनी ज्ञानाची गंगा अविरत वाहती ठेवली. त्यांच्या सौम्य स्वभावाने, अभ्यासू वृत्तीने आणि संयमी भाषणाने प्रत्येक सहकाऱ्याला, विद्यार्थ्याला आणि शिष्याला आपलेसे केले असल्याचे मत त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.
प्राचार्य म्हणून त्यांनी ‘गुणवत्ता, मूल्य आणि नवोन्मेष’ यांचा सन्मान राखत महाविद्यालयाला नवे शैक्षणिक आयाम दिले. जिओफेस्ट, भूगोल दिन, राष्ट्रीय परिषदांचे यशस्वी आयोजन, संशोधन प्रकल्प आणि सामाजिक उपक्रम यांच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या लौकिकात मोठी भर घातली. विद्यार्थ्यांशी, सहकाऱ्यांशी आणि पालक वर्गाशी आत्मीय नातं राखणाऱ्या या प्राचार्याचे कार्य म्हणजे शिक्षणात संस्कृतीची मुळे घट्ट रोवण्यासारख्या असा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या आहेत.