शालेय पुस्तकांतून राज्यघटनेची प्रस्तावना हटवली? NCERT आणि शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण
एनसीईआरटीच्या पुस्तकांमधून राज्यघटनेची प्रस्तावना काढून टाकल्याचा आरोप निराधार असल्याचे सांगत एनसीईआरटी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान 'एक्स' या सोशल मीडियाद्वारे सर्व आरोप फेटाळत स्पष्टीकरण दिले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
एनसीईआरटीच्या पुस्तकांमधून (NCERT Book) राज्यघटनेची प्रस्तावना काढून टाकल्याचा (The Preamble to the Constitution was removed) आरोप निराधार असल्याचे सांगत एनसीईआरटी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Education Minister Dharmendra Pradhan) 'एक्स' या सोशल मीडियाद्वारे सर्व आरोप फेटाळत स्पष्टीकरण दिले आहे. पहिल्यांदाच भारतीय राज्यघटनेच्या विविध पैलू जसे की प्रस्तावना, मूलभूत कर्तव्ये, मूलभूत हक्क आणि राष्ट्रगीत यांना महत्त्व देत दिले असून त्यांचा समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
अलीकडेच अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, एनसीईआरटीने यावर्षी प्रसिद्ध केलेल्या इयत्ता 3 आणि इयत्ता 6 च्या पाठ्यपुस्तकांमधून संविधानाची प्रस्तावना काढून टाकण्यात आली आहे. NCERT ने ट्विट करून हा आरोप खोटा ठरवला आहे.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही ट्विट केले की, भारतीय शिक्षण व्यवस्थेला मूर्खपणा म्हणणाऱ्यांनी खोटे बोलण्यापूर्वी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. शिक्षणासारखा विषय खोट्याच्या राजकारणासाठी वापरणे आणि त्यासाठी मुलांची मदत घेणे ही काँग्रेस पक्षाची घृणास्पद मानसिकता दर्शवते.
त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'काँग्रेस पक्षात थोडीही लाज आणि आत्मभान उरले असेल तर आधी राज्यघटना, संवैधानिक मूल्ये आणि NEP समजून घ्या आणि देशातील मुलांच्या नावावर क्षुद्र राजकारण करणे थांबवा.
