खाजगी विनाअनुदानित शाळांना टप्पा अनुदान मंजूर; शासन निर्णय प्रसिद्ध

शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार, सध्या २० टक्के, ४० टक्के व ६० टक्के टप्पा अनुदान घेणाऱ्या शाळांना पुढील २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच, पात्र ठरलेल्या २३१ शाळांना नव्याने २० टक्के अनुदान मिळणार आहे. या निर्णयामुळे दरवर्षी सरकारवर अंदाजे ९७० कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

खाजगी विनाअनुदानित शाळांना टप्पा अनुदान मंजूर; शासन निर्णय प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील विविध शाळांमधील शिक्षकांनी टप्पा अनुदानाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन उभे करण्यात आले होते. या आंदोलनास अनेक विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी भेटी दिल्या होत्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये टप्पा अनुदानासाठी निधी देण्याच्या निर्णयाला मंजुरी (Approval of grant funding decision) देण्यात आली. त्यानंतर आता अनुदान टप्पा मंजूरीसाठी (Grant approval stage) शासन निर्णय प्रसिद्ध (Government decision published) करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ५२ हजार २७६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी (52 thousand 276 teachers and non-teaching staff benefit) यांना थेट फायदा होणार आहे. हा निर्णय १ ऑगस्ट २०२५ पासून लागू करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. 

ICSI सीएस प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्हचा परीक्षेचा निकाल जाहीर

शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार, सध्या २० टक्के, ४० टक्के व ६० टक्के टप्पा अनुदान घेणाऱ्या शाळांना पुढील २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच, पात्र ठरलेल्या २३१ शाळांना नव्याने २० टक्के अनुदान मिळणार आहे. या निर्णयामुळे दरवर्षी सरकारवर अंदाजे ९७० कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. 

राज्यातील खाजगी विनाअनुदानितअंशतः अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना येत्या ऑगस्ट महिन्यापासून वेतन अनुदानाचा पुढील टप्पा अदा करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीस नुकतीच मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली होती. यासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात निवेदन दिले होते. त्यानंतर आता प्रत्यक्ष अनुदान टप्पा मंजूर करण्यासाठी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील ५० हजारांपेक्षा अधिक शालेय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. ऐक गणपती उत्साहाच्या तोंडावर सरकारने या कर्मचाऱ्यांना आनंदावार्ता दिली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.