NCERT च्या विरोधात अंधश्रध्दा निर्मूलन समिती मैदानात

अनुवांशिकता आणि उत्क्रांती या विषयी दहावीच्या अभ्यासक्रमात असलेला भाग वगळून त्या जागी केवळ अनुवांशिकता एव्हडाच भाग ठेवलेला आहे.मात्र, अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचे विज्ञान वगळण्याच्या निर्णयाचा महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने निषेध केला.

NCERT च्या विरोधात अंधश्रध्दा निर्मूलन समिती मैदानात
darwin theory

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

गेल्या आठवड्यात एनसीइआरटीने NCERT दहावीच्या अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचे विज्ञान सांगणारा भाग (डार्विनचा सिध्दांत) Darwin's theory वगळलेला असल्याची माहिती समोर आली आहे. अनुवांशिकता आणि उत्क्रांती या विषयी दहावीच्या अभ्यासक्रमात असलेला भाग वगळून त्या जागी केवळ अनुवांशिकता एव्हडाच भाग ठेवलेला आहे.मात्र, अभ्यासक्रमातून उत्क्रांतीचे विज्ञान वगळण्याच्या निर्णयाचा महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने Andhashraddha Nirmulan Samiti (अंनिस) निषेध केला असून ‘चला उत्क्रांती समजून घेवूया’ हे अभियान राबवून आपला निषेध कृतीतून व्यक्त करणार असल्याचेही अंनिसतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

  पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पती कशी झाली याची शास्त्रीय मांडणी उत्क्रांतीच्या सिद्धांताच्या द्वारे केली जाते. टप्प्याटप्प्याने एक पेशीय प्राणी त्यानंतर  बहुपेशीय प्राणी, मानवाचे आधीच्या टप्प्या वरील माकड आणि सर्वात शेवटी मानव अशा टप्प्यांच्या मधून मानवी उत्क्रांती कशी झाली यांची शास्त्रीय माहिती या मध्ये दिली आहे. पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्याच्या मागे कोणतीही विशिष्ट शक्ती नसून उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून ती झाली आहे. हि माहिती शालेय वयातील मुलांना पहिल्यांदा उत्क्रांतीच्या सिद्धांतातून होते. मानवी जीवनाच्या वर प्रभाव टाकणाऱ्या अनेक अंधश्रद्धाची निर्मिती ही मानवी जीवनाचा उगम कसा झाला यांची योग्य माहिती नसल्याने होतो.त्या मुळे उत्क्रांतीचा सिद्धांत हा शालेय अभ्यासक्रमातून शिकवल्याने विद्यार्थ्यांची मानवी जीवनाच्या उत्प्पती मागे असलेल्या विज्ञानवादी भूमिकेशी तोंड ओळख होते.

 प्रत्यक्षात सहावी सातवीच्या विद्यार्थ्याला ह्या विषयी प्रश्न पडू लागतात.  त्यामुळे तेव्हा पासून टप्प्याटप्प्याने ह्या विषयी माहिती शालेय अभ्यास क्रमातून येणे आवश्यक आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत हा शालेय पुस्तकांच्या मधून वगळल्यामुळे मुलांच्यामध्ये विज्ञानवादी मानसिकता निर्माण होण्यात अडथळा निर्माण होणार आहे, असे अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर,मिलिंद देशमुख नंदिनी जाधव आणि श्रीपाल लालवाणी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. 

 भारतातील आणि परदेशातील अनेक विद्यापीठांच्यामध्ये हा उत्क्रांती सिद्धांत जीव शास्त्रातील मुलभूत सिद्धांत म्हणून शिकवला जातो. उत्क्रांती या विषयी विशेष कोर्स देखील शिकवले जातात, या पार्श्वभूमीवर उत्क्रांतीचा सिद्धांत हा  दहावीच्या अभ्यासक्रमातून वगळल्या मुळे जे विद्यार्थी दहावी नंतर विज्ञान ही शाखा घेणार नाहीत. त्यांना उत्क्रांतीच्या सिद्धांताची माहिती मिळणार नाही.देशभरतील अठराशे वैज्ञानिकांनी या गोष्टीला विरोध नोंदवला आहे.  त्यास  महाराष्ट्र अनिस पाठींबा देत आहे, असेही या पत्रात नमूद केले आहे.

 

चौकट –

चला उत्क्रांती समजून घेवूया अभियान

 

१.       उत्क्रांती विषयावर शालेय मुलांच्या साठी पुस्तिका प्रकाशन

 

२.       विज्ञान शिक्षकांच्या साठी उत्क्रांती विषयावर  कार्यशाळा 

 

३.       NCERT ला उक्रांती विषय शिक्षणत समाविष्ट करण्या साठी पत्र लिहिण्याची मोहीम 

 

४.       महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात उत्क्रांती विषयावर मांडणी करणाऱ्या प्रशिक्षित वक्त्यांचे नेटवर्क उभे करणे