मुलींसाठी टोल फ्री क्रमांक तर महाविद्यालय तपासणीसाठी टास्क फोर्स ; चंद्रकांत पाटील

मुलींसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात येणार असून महाविद्यालयाची तपासणी करण्यासाठी दहा जणांची टास्क फोर्स तयार करण्यात आल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मुलींसाठी टोल फ्री क्रमांक तर महाविद्यालय तपासणीसाठी टास्क फोर्स ; चंद्रकांत पाटील

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील 642 कोर्सेना आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न (Income less than eight lakhs) असलेल्या पाल्यांच्या मुलींना संपूर्ण फी माफ करण्यात आली आहे. तसा जीआरही काढण्यात आलेला असून महाविद्यालयाकडून फी मागण्यात आली तर त्या संबंधित संस्थांची संलग्नता तत्काळ रद्द करण्यात येईल. तसेच मुलींसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात (Toll free number will be launched for girls) येणार असून महाविद्यालयाची तपासणी करण्यासाठी दहा जणांची टास्क फोर्स तयार करण्यात (To create a tax force) आले आहे,असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांनी सांगितले.

मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र अंमळनेर येथे भूमिपूजन कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली.  यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पाटील बोलत होते. ते म्हणाले, राज्यामध्ये काही महाविद्यालयात शुल्क आकारले जात आहे. याबाबत गेल्या चार-पाच दिवसापासून विचारविनिमय सुरू आहे. महाविद्यालय ट्युशन फी घेत नाहीत. आम्ही इतर फी आपण माफ करू शकत नाही. त्यामुळे गॅदरिंग, जिमखाना, मॅक्झिन फी घेण्यात येत आहे, तो फरक पाहिला जाईल. यासाठी दहा जणांची टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. तसेच मुलींसाठी टोल फ्री क्रमांक लवकरच सुरू करणार असल्याचे चंद्रकांत पाटलांनी यांनी यावेळी सांगितले.

शुल्क माफीबाबत महाविद्यालयाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच नियम व अटी पूर्ण करण्यासाठी, तपासणीसाठी प्रत्येक ठिकाणी एक व्यक्ती त्या त्या ठिकाणी जाणार आहे. जर यामध्ये त्रुटी दिसल्या तर  संबंधित संस्थांची संलग्नता तत्काळ रद्द करण्यात येईल. त्यासाठी कठोर नियम बजावून जी आर काढल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले. 

यावेळी त्यांनी मुलींसोबत संवाद साधत सांगितले की, तुमच्या अडचणीवर निबंध लिहून पाठवा. यावर मुलींनी सांगितले की, शाळेत जाण्यासाठी बस येत नाही. काहींना दहा दहा किलोमीटर पायी जावे लागते. यासाठी खाजगी पातळीवर रोजगार उपलब्ध करता येईल काय ? यासाठी शाळा महाविद्यालयांच्याशी विचार विनिमय सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.