मानवी तस्कारी! मुंबईत ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता, पोलीसांकडून हाय अलर्ट जारी

मुंबईतून चिंताजनक बातमी समोर आली आहे. मागील ३६ तासांमध्ये एकट्या मुंबईतून १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. या घटनेमुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये शाळकरी मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. बेपत्ता झालेल्या १२ अल्पवयीन मध्ये ८ मुलींचा तर ४ मुलांचा समावेश आहे.

मानवी तस्कारी! मुंबईत ३६ तासांत १२ अल्पवयीन मुले बेपत्ता, पोलीसांकडून हाय अलर्ट जारी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मुंबईतून चिंताजनक बातमी (Worrying news) समोर आली आहे. मागील ३६ तासांमध्ये एकट्या मुंबईतून १२ अल्पवयीन मुले बेपत्ता (12 minors are missing) झाल्याच्या तक्रारी दाखल (Missing person reports filed) करण्यात आल्या आहे. या घटनेमुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये शाळकरी मुलांचा (Inclusion of school children) मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. बेपत्ता झालेल्या १२ अल्पवयीन मध्ये ८ मुलींचा तर ४ मुलांचा समावेश आहे.

बेपत्ता झाल्याने मुलांची वाढती संख्या लक्षात घेता आता मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत. शिवजीनगर- ४, साकीनाका- ४, अँटाॅप हिल- २, ओशिवारा -१, मानखुर्द -१, बांगूर नगर -१ आणि घाटकोपर - १ या भागांतून तक्रारी घडल्याच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या असून, मानवी तस्करीचा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जून ते डिसेंबर २०२५ दरम्यान मुंबईतून १४५ मुले बेपत्ता झाली, ज्यामध्ये ९३ मुलींचा समावेश होता. दैनिक आकडेवारीनुसार मुंबईतून दररोज सरासरी ४ ते ५ अल्पवयीन मुली बेपत्ता होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कोणाला काही संशय किंवा कोणती माहिती मिळताच १०० नंबरवर किंवा स्थानिक पोलिस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

बेपत्ता प्रकरणांच्या वाढत्या संख्येमुळे पोलिस यंत्रणा सक्रिय झाली आहे. पोलिसांनी सर्व पोलिस ठाण्यांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. सर्व रेल्वे स्थानके, बस स्थानके, टर्मिनल आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा वाढवली आहे. तपासात सायबर सेलला सामील केले आहेत. सीसीटीव्ही फुटेजचे तपशीलवार विश्लेषण सुरू केले. शहरभरात हरवलेल्या मुलांचे फोटो प्रसारित केले.