साताऱ्यात धक्कादायक घटना! मुख्याध्यापकाकडून महिला शिक्षिकेला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण
मुख्याध्यापक दीक्षित यांनी शाळेतील एका विद्यार्थ्याला वर्गाबाहेर चप्पल काढून बसवून हीन वागणूक दिली होती. प्रशिक्षण संपवून परतल्यावर विद्यार्थ्याचे वडील संतोष वाडकर यांनी वर्गशिक्षिकेकडे याबाबत विचारणा केली. शिक्षिकेने मुख्याध्यापकाकडे याचे स्पष्टीकरण मागितले. यावर दीक्षित यांनी दमदाटी करत, “तुम्ही वर्गशिक्षिका आहात, तुम्हीच मिटवा, माझ्याकडे का आलात?” असे म्हणत धमकी दिली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील (Satara Crime News) खावली येथील जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. मुख्याध्यापकाने आपल्याच सहकारी महिला शिक्षिकेला लाकडी (Teacher brutally beaten up) दांडक्याने बेदम मारहाण (Assault by the Headmaster) केल्याची घटना समोर आली. विद्यार्थ्यांना मारहाण केल्याबद्दल विचारणा केल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी वाई पोलिसांनी मुख्याध्यापक धर्मेंद्र विष्णू दीक्षित यांना अटक (Principal arrested) केली आहे. घटनामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पीडित महिला शिक्षिका खावली शाळेत कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्या पाचवड येथे पाच दिवसांच्या शासकीय प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या. या दरम्यान मुख्याध्यापक दीक्षित यांनी शाळेतील एका विद्यार्थ्याला वर्गाबाहेर चप्पल काढून बसवून हीन वागणूक दिली होती. प्रशिक्षण संपवून परतल्यावर विद्यार्थ्याचे वडील संतोष वाडकर यांनी वर्गशिक्षिकेकडे याबाबत विचारणा केली. शिक्षिकेने मुख्याध्यापकाकडे याचे स्पष्टीकरण मागितले. यावर दीक्षित यांनी दमदाटी करत, “तुम्ही वर्गशिक्षिका आहात, तुम्हीच मिटवा, माझ्याकडे का आलात?” असे म्हणत धमकी दिली.

त्यानंतर काही वेळाने मुख्याध्यापक दीक्षित वर्गातील दोन विद्यार्थ्यांना मारहाण करत होते. हे पाहून महिला शिक्षिकेने मध्यस्थी करत मुलांना परिपाठासाठी पाठवण्यास सांगितले. यामुळे रागावलेल्या दीक्षित यांनी शिक्षिकेला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. पाठलाग करूनही मारहाण सुरू ठेवल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे शाळेत एकच खळबळ उडाली.
वाई पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्याध्यापक दीक्षित यांना तातडीने अटक करण्यात आली. पीडित शिक्षिकेच्या फिर्यादीवरून कारवाई सुरू आहे. या घटनेने वाई तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महिला शिक्षिकांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
शिक्षण विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि शाळांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे. विद्यार्थ्यांना मारहाण आणि सहकाऱ्यांवर अत्याचार यासारख्या घटना शैक्षणिक गुणवत्तेला बाधा आणणाऱ्या आहेत. पोलिस अधिक तपास करत असून, न्याय प्रक्रिया जलद गतीने पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.