मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस ३० जुलैपर्यंत मुदतवाढ
गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश देण्याच्या प्रक्रियेला प्राधान्य देण्यात आले आहे. जागा रिक्त राहिल्यास संबंधित महाविद्यालये स्वतः गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतील. ही मुदतवाढ विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आली असून, सर्व महाविद्यालयांनी वेळेच्या आत प्रक्रिया पूर्ण करावी, असे विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) पदवी, पदव्युत्तर आणि चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या (Undergraduate and postgraduate courses) प्रवेश प्रक्रियेस महत्त्वाची मुदतवाढ जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार ही मुदत ३० जुलै २०२६ पर्यंत वाढवण्यात (Deadline for admission process extended till July 30) आली आहे. विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी ठरली आहे. विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार (Circular issued by the university) १७ ते ३० जुलै या कालावधीत संपूर्ण प्रवेश प्रक्रिया काटेकोरपणे पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करण्याची ही शेवटची संधी असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. चारही विद्या शाखांतील विविध अभ्यासक्रमांसाठी ही प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पूर्णपणे पारदर्शक ठेवण्यात आली आहे. पदवी अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी https://muugadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर आणि पदव्युत्तर व चार वर्षीय अभ्यासक्रमांसाठी https://muadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, त्या महाविद्यालयाचे ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज भरणेही आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण करता येणार असून, गोंधळ टाळण्यास मदत होईल.
गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश देण्याच्या प्रक्रियेला प्राधान्य देण्यात आले आहे. जागा रिक्त राहिल्यास संबंधित महाविद्यालये स्वतः गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतील. ही मुदतवाढ विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेण्यात आली असून, सर्व महाविद्यालयांनी वेळेच्या आत प्रक्रिया पूर्ण करावी, असे विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी तात्काळ नोंदणी करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
या मुदतवाढीमुळे हजारो विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः ज्यांना विविध कारणांमुळे आतापर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती, त्यांना आता शेवटची संधी मिळाली आहे. मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार करत ही निर्णय घेतला असल्याचे दिसते. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी आणि वेळेत नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.