पेपरफुटीचे घोटाळे शासन मान्य ; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप

अहिल्यानगर जिल्हा बँकेत जेवढे संचालक आहेत त्यांचे सर्व नातेवाईक, गावकरी जवळचे संबंधातले लोक या बँकेत लागले आहेत. या सर्व घोटाळ्याची विरोधकांना सुद्धा कल्पना आहे पण ते का शांत आहेत हे समजायला काही मार्ग नाही. एक सक्षम विरोधक असल्या शिवाय राज्याची घडी व्यवस्थित बसत नाही हे मात्र खर आहे.

पेपरफुटीचे घोटाळे शासन मान्य ; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यात महायुतीचे सरकार (Mahayuti Government) आल्यापासून विविध परीक्षांमध्ये खूप घोटाळे झाले आहे.  त्यातला एक घोटाळा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा बँक घोटाळा (Ahilyanagar District Bank Scam) आहे. बँक सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे. एकूण पदभरती 700 च्या आस पास जागांची होती. यामध्ये किमान 600 बोगस मुले भरली (Bogus recruitment of 600 posts) गेली. प्रत्येकाने जागा वाटून घेतल्या आहेत. ही गोष्ट सर्वांना माहीत आहे तरीही सर्व जण शांत आहेत. यावरूनच समजते जे महाराष्ट्रमध्ये पेपरफुटीचे, घोटाळेचे सत्र सुरू आहे ते शासन मान्य आहे, असा गंभीर आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination Coordination Committee) महायुती सरकारवर केला आहे. 

अहिल्यानगर जिल्हा बँकेत जेवढे संचालक आहेत त्यांचे सर्व नातेवाईक, गावकरी जवळचे संबंधातले लोक या बँकेत लागले आहेत. या सर्व घोटाळ्याची विरोधकांना सुद्धा कल्पना आहे पण ते का शांत आहेत हे समजायला काही मार्ग नाही. एक सक्षम विरोधक असल्या शिवाय राज्याची घडी व्यवस्थित बसत नाही हे मात्र खर आहे. आपल्या राज्यात विरोध करण्यासाठी कोणीच नाहीये. महत्वाचे मुद्दे बाजूला राहतात आणि ही लोक विरोध निरर्थक गोष्टींना करत बसतात.

विशेष म्हणजे रोहित पवार, सत्यजित तांबे आणि निलेश लंके यांना टॅक करत या भरती घोटाळ्यांवर आवाज उठवण्याचे आवाहन कण्यात आले आहे. आपल्याला ह्या गोष्टी माहिती असेल पण आपण का शांत आहात याचे उत्तर द्या किंवा याबाबत आवाज उठवा बघा कसा घोळ सुरू आहे. यावर एक SIT बसवा सत्य तुमच्या समोर येईल. सत्यजीत तांबे म्हटले होते फडणवीस एका मेसेज वर काम करतात मग करा त्यांना एक मेसेज आणि लावा या भरतीची चौकशी, असे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटले आहे.