हिंदी भाषिक राज्य आर्थिक दृष्या मागास; हिंदी भाषा केवळ 200 वर्षांपूर्वीची
भाषिक अस्मितेसाठी एकत्र आलेल्या मराठी बांधवांमध्ये आता जातीपातीच्या वादावरून भांडणे लावून देतील. त्यामुळे त्यांच्या या राजकाणाला बळी पडू नका: राज ठाकरे
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मा.बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे दोघे इंग्रजी माध्यमातून शिकले. या दोघांबद्दल मराठी विषयक शंका घेऊ शकता का? ते इंग्रजी माध्यमातून शिकले तरीही त्यांचा मराठी विषयीचा कडवटपणा कमी झाला नाही. तसेच दक्षिणेकडील अनेक राज्यातील नेते व चित्रपट क्षेत्रातील कलाकार हे इंग्रजी माध्यमातून शिकले.म्हणून त्यांनी आपल्या भाषेचा कडवटपणा सोडला नाही. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी आधी यांनी भाषा विषयाला डिवचून पाहिले.पण मराठी माणूस मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही.भाषिक अस्मितेसाठी एकत्र आलेल्या मराठी बांधवांमध्ये आता जातीपातीच्या वादावरून भांडणे लावून देतील. त्यामुळे त्यांच्या या राजकाणाला बळी पडू नका,असे आवाहन महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केले.
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय सामाजिक व राजकीय दबावामुळे राज्य शासनाला मागे घ्यावा लागला.त्याचा आनंद साजरा करण्याच्या निमित्ताने मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते.मराठी विषयांवरून निर्माण झालेल्या वादानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आले.त्यानंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर तिसरी भाषा लादली जात आहे. केंद्र व राज्य यांच्यातील दुवा म्हणून त्रीभाषा सूत्र आणले होते.तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात हिंदी सक्तीचा उल्लेख नाही.तरीही विद्यार्थ्यांना शिकवण्याबाबत सरकार आग्रही होते. परंतु, भाषेसाठी मराठी माणूस पेटून उठतो तेव्हा काय होते. हे महाराष्ट्राला कळले आहे. तसेच उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश येथे कोणती तिसरी भाषा आणणार असा खोचक प्रश्नही राज्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
लालकृष्ण आडवाणी, स्टॅलिन, पवन कल्याण, जय ललिता, ए.आर. रहमान यांच्यासह अनेक नेते व राज्यकर्ते इंग्रजी माध्यमात शिकले आहेत.याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले.तसेच हिंदी भाषिक राज्य आर्थिक दृष्या मागास इतर भाषा असणारे राज्य ही श्रीमंत का आहेत,असा सवाल उपस्थित करून राज ठाकरे म्हणाले, भाषा कोणतीही असो ती श्रेष्ट असते. भाषा मोठी करण्यासाठीअनेक वर्ष लागतात. हिंद प्रांतावर 125 वर्षे मराठ्यांनी राज्य केले. तेव्हा आम्ही कोठेही मराठी लादली नाही, हिंदी भाषा 200 वर्षीची आहे. महाराज्यांच्या काळातही हिंदी भाषा नव्हती,असेही राज ठाकरे म्हणाले.
--------------------------