डी.ई.एस. नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय आणि प्रबोधन मंचतर्फे भारतीय संविधान परिषदेचे आयोजन!

या परिषदेत संविधानातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने त्यामध्ये डॉ. शांतिश्री पंडीत, अॅड.उदम वारुंजीकर, अॅड. आशिष जाधवर, अॅड. आशिष सोनवणे यांची व्याख्याने तसेच चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. जसे की, फेडरलिझम, सामाजिक न्याय, संविधानाच्या उद्दिष्टिका, संविधान सभेतील चर्चा व मूलभूत हक्क यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर मान्यवर तज्ज्ञ आपले विचार मांडणार आहेत.

डी.ई.एस. नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय आणि प्रबोधन मंचतर्फे  भारतीय संविधान परिषदेचे आयोजन!

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

डी.ई.एस.नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय (D.E.S.NAVALMAL FIRODIA LAW COLLEGE) आणि प्रबोधन मंच पुणे (Prabodhan Manch Pune) यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. हे परिषद १४ व १५ फेब्रुवारी २०२५ रोजी फर्ग्यूसन कॉलेज कॅम्पसमध्ये (Ferguson College Campus) मध्ये होणार आहे.   भारतीय संविधान वर्तमान (Indian Constitution Present) आणि भविष्याचा दृष्टिकोन (A view of the future) या विषयांवर परिषद आयोजित होणार आहे. 

या परिषदेचे उद्‌घाटन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.  १५ फेब्रुवारीला होणाऱ्या समारोप सत्रात न्यायमूर्ती अंबादास जोशी (निवृत्त उच्च न्यायालय न्यायाधीश) हे  प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

या परिषदेत संविधानातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने होणार आहेत. त्यामध्ये डॉ. शांतिश्री पंडीत, अॅड.उदम वारुंजीकर, अॅड. आशिष जाधवर, अॅड. आशिष सोनवणे यांची व्याख्याने तसेच चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.  फेडरलिझम, सामाजिक न्याय, संविधानाच्या उद्दिष्टिका, संविधान सभेतील चर्चा व मूलभूत हक्क यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञ आपले विचार मांडणार आहेत.

महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अॅड.अशोक पलांडे आणि विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुनीता आढाव तसेच प्रचोधन मंच पुणेचे अध्यक्ष हरिभाऊ मिरासदार, सह-संयोजक अजय महाजन हे या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून काम पाहणार आहेत.

दरम्यान, ही परिषद विधी विद्यार्थ्यांसह संशोधक, शिक्षक, कायदेतज्ज्ञ आणि संविधान अभ्यासकांसाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.