शिवाजी विद्यापीठाचा अंधळा कारभार चव्हाट्यावर; कागदावर महाविद्यालय, १८ प्राध्यापकांची भरती

एका बाजूला नवीन शैक्षणिक  धोरणात शिक्षणाला बळ देण्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसरी बाजूला एवढा अंधळा कारभार करायची की, नंतर आपलीचं मान शरमेने खाली जाईल. झाले असे की, करवीर येथील सूर्यकांत सदाशिव दिंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने (Suryakant Sadashiv Dinde College of Arts, Commerce and Science) कागदावरच महाविद्यालय दाखवल्याचा प्रताप समोर आला आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाने कुठलीही पडताळणी न करता या सर्व गोष्टींना मान्यता दिली. 

शिवाजी विद्यापीठाचा अंधळा कारभार चव्हाट्यावर; कागदावर महाविद्यालय, १८ प्राध्यापकांची भरती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात (Shivaji University Kolhapur) 'अंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय' असा प्रकार समोर आला आहे. एका बाजूला नवीन शैक्षणिक  धोरणात शिक्षणाला बळ देण्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसरी बाजूला एवढा अंधळा कारभार करायची की, नंतर आपलीचं मान शरमेने खाली जाईल. झाले असे की, करवीर येथील सूर्यकांत सदाशिव दिंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने (Suryakant Sadashiv Dinde College of Arts, Commerce and Science) कागदावरच महाविद्यालय दाखवल्याचा प्रताप समोर आला आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाने कुठलीही पडताळणी न करता या सर्व गोष्टींना मान्यता दिली. 

सूर्यकांत सदाशिव दिंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने विविध विषयांसाठी शिवाजी विद्यापीठाकडून १८ उमेदवारांची पूर्ण वेळ सहाय्यक प्राध्यापक म्हणून मान्यता घेतली. विशेष म्हणजे यातील दहाहून अधिक जणांना आपण संबंधित महाविद्यालयात प्राध्यापक आहोत,  याची देखील कल्पना नाही. यातील काही जण बँकेत, पतसंस्थेत, पुण्यात विविध क्षेत्रात नोकरीला आहेत. संबंधित व्यक्तींच्या कागदपत्रांचा गैरवापर करून या महाविद्यालयाने केलेल्या प्रतापाने कागदावर प्राध्यापक बनल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. 

बहिरेश्वर येथील ज्ञान विज्ञान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गणेशवाडी- बीडशेड येथे विनाअनुदानित तत्त्वावर सूर्यकांत दिंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे. या संस्थेने २०२४-२५ या वर्षात १८ जणांची पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापकांची मान्यता विद्यापीठाकडून घेतली आहे. मात्र, यातील दहाहून अधिक प्राध्यापकांना आपण या संस्थेत प्राध्यापक आहोत, हे माहितीच नाही. 

पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील माध्यमिक शाळेतील शिक्षक सागर कांबळे यांच्या शैक्षणिक कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांनाही या महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून दाखवण्यात आले. ही गोष्ट कांबळे यांना समजल्याने त्यांनी विद्यापीठाशी पत्रव्यवहार केल्यानंतर या महाविद्यालयाची बनवेगिरी उघडकीस आली. 

दिंडे महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक दाखवलेल्या कांबळे यांच्यासह जवळपास दहा जणांचा या महाविद्यालयाशी काडीमात्र संबंध नाही. त्यांनी या महाविद्यालयात कथी मुलाखत दिलेली नाही. त्यांना ते कुठे आहे याची माहितीही नाही. मात्र, तरीही आमची कागदपत्रे या महाविद्यालयांकडे गेलीच कशी, असा सवाल या मंडळींनी केला आहे. कांबळे यांनी एका लिपिकाकडे शैक्षणिक अर्ज भरण्यासाठी व्हॉट्सअॅपवर कागदपत्रे पाठवली होती. त्या लिपिकानेच या कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा आक्षेप आहे.