मोठा निर्णय! शाळा परिसरात साॅफ्ट ड्रिंक विक्रीला बंदी, तुकाराम मुंढे येताच सरकार ॲक्शन मोडवर

कॅफीन आणि साखरेचे धोकादायक मिश्रण मुलांना व्यसन लावू शकते, असा दावा करत त्यांनी सरकारला तीन प्रश्न विचारले होते. चाचण्यांमध्ये हे पेय घातक असल्याचे कंपनीनेही मान्य केल्याचे पाचपुते यांनी सांगितले.

मोठा निर्णय! शाळा परिसरात साॅफ्ट ड्रिंक विक्रीला बंदी, तुकाराम मुंढे येताच सरकार ॲक्शन मोडवर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यात शाळा परिसरात गुटखा, पानमसाला, सिगारेट यासह आता स्टिंग या शीतपेयाची विक्रीही बंद (Sale of soft drinks stopped) करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अन्न आणि औषध प्रशासन (Food and Drug Administration) खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी याबाबत निर्देश जारी केले आहेत. शाळेच्या ५०० मीटर परिसरात (Within a 500-meter radius of the school) स्टिंग विक्री केल्यास धडक कारवाई होणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे नवनिर्वाचित आयुक्त तुकाराम मुंढे (Commissioner Tukaram Mundhe) येताच सरकारने हा धडाकेबाज निर्णय घेतला आहे. 

आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत स्टिंग पेयाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. कॅफीन आणि साखरेचे धोकादायक मिश्रण मुलांना व्यसन लावू शकते, असा दावा करत त्यांनी सरकारला तीन प्रश्न विचारले होते. चाचण्यांमध्ये हे पेय घातक असल्याचे कंपनीनेही मान्य केल्याचे पाचपुते यांनी सांगितले. यानंतर सरकारने तातडीने कारवाई करत शाळा परिसरात स्टिंग विक्रीला बंदी घातली आहे. 

स्टिंग शाळेच्या आवारात विकले जाते हे काही अंशी खरे आहे. मात्र, मागील ८ ते १० दिवसांपासून शिक्षक आणि प्राचार्यांना विद्यार्थ्यांना याबाबत जागरूक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना हे पेय खरेदी करण्यापासून रोखता येईल. शाळा परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे मंत्री झिरवळ यांनी सांगितले.

स्टिंगसारख्या पेयांमध्ये असलेले कॅफीन आणि साखरेचे प्रमाण शाळेतील मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे व्यसन, वजन वाढ, एकाग्रता कमी होणे असे दुष्परिणाम होऊ शकतात. शासनाने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्य रक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभाग याची कठोर अंमलबजावणी करणार असल्याचे झिरवळ यांनी स्पष्ट केले आहे. 

शाळा परिसरातील आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय एक सकारात्मक पाऊल मानला जात आहे. पालक आणि शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात सहकार्य करावे, असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.