हायकोर्ट लिपिकपदाच्या ऑनलाइन परीक्षेत मोठा गोंधळ; सर्व्हर डाऊन, कीबोर्ड बिघाडाने विद्यार्थी संतप्त

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदासाठी ऑनलाइन परीक्षा सुरू असताना छत्रपती संभाजीनगर शहरातील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ उडाला. परीक्षा सुरू होताच अचानक सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला.

हायकोर्ट लिपिकपदाच्या ऑनलाइन परीक्षेत मोठा गोंधळ; सर्व्हर डाऊन, कीबोर्ड बिघाडाने विद्यार्थी संतप्त

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या  (Bombay High Court) लिपिक पदासाठी ऑनलाइन परीक्षा  (Online examination) सुरू असताना छत्रपती संभाजीनगर शहरातील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर  (Surana Nagar exam center) प्रचंड गोंधळ उडाला. परीक्षा सुरू होताच अचानक सर्व्हर डाऊन (Server down) झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. या तांत्रिक बिघाडामुळे शेकडो परीक्षार्थींची परीक्षा खोळंबली.(Exam disruption)  विशेषतः दूरवरून आलेल्या उमेदवारांना या अचानक उद्भवलेल्या अडचणीचा मोठा फटका बसला. परीक्षा केंद्रावर पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे (Outrage among parents and students) वातावरण पसरले होते.

तांत्रिक बिघाडामुळे संतप्त झालेल्या काही परीक्षार्थींनी गोंधळ घातल्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या अधिकाऱ्यांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र खोळंबलेली परीक्षा नव्याने घेतली जाणार की विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ दिला जाणार, याबाबत अद्याप प्रशासनाकडून कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. यामुळे उमेदवारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे.

या भरती प्रक्रियेसाठी २६ एप्रिल रोजी लेखी परीक्षा पार पडली होती. त्यातून राज्यातून एकूण १३,००० उमेदवार टंकलेखक पदासाठी पात्र ठरले होते, तर एका पदासाठी सुमारे २९०० विद्यार्थी या कौशल्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. अवघ्या पाच दिवसांपूर्वी पत्र काढून ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने स्क्रीन टू स्क्रीन होणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. या परीक्षेमध्ये १० मिनिटांत ४०० शब्द टाइप करायचे होते. एकूण २० गुणांच्या या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान १० गुण आवश्यक आहेत. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू असून चार चुकांमागे एक गुण वजा केला जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ कल्याण येथील एपीएमसी मार्केटमधील परीक्षा केंद्रावरही हायकोर्ट लिपिकपदाच्या परीक्षेत मोठा गोंधळ उडाला. ऐन टायपिंगच्या वेळी कीबोर्डमध्ये बिघाड उद्भवल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. या ढिसाळ कारभारामुळे संतप्त परीक्षार्थींनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. दोन्ही केंद्रांवरील घटनांमुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि प्रशासकीय तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

विद्यार्थी आणि पालक या गोंधळाबाबत प्रशासनाकडून तातडीने स्पष्टीकरण आणि योग्य उपाययोजनांची मागणी करत आहेत. अशा महत्त्वाच्या भरती परीक्षेत तांत्रिक अडचणी वारंवार उद्भवणे हे उमेदवारांच्या भवितव्याशी संबंधित गंभीर मुद्दा आहे. प्रशासनाकडून पुढील पावले उचलली जाईल की नाही, याची प्रतीक्षा सर्व संबंधित पक्ष करत आहेत.