वैचारिक माओवादी शैक्षणिक परिसरांमध्ये प्रवेश करत आहेत :देवेंद्र फडणवीस
पुणे शहरात होत असलेल्या अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारीणी बैठकीच्या अंतर्गत आयोजित नागरी स्वागत समारोह कार्यक्रमात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.
![वैचारिक माओवादी शैक्षणिक परिसरांमध्ये प्रवेश करत आहेत :देवेंद्र फडणवीस](https://eduvarta.com/uploads/images/2023/05/image_750x_6471c1b1e0266.jpg)
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भारतात एक विचारधारा आहे जी तरुणांच्या मानसिकतेत विषाणू सोडण्याचे काम करत आहे. माओवाद्यांच्या बंदुकीतून लढण्याचे प्रमाण कमी झाले आहे.परंतु वैचारिक माओवादी आमच्या शैक्षणिक परिसरांमध्ये प्रवेश करत आहेत. त्याविरूद्ध आपण संघटित व्हायला हवे. तसेच भारताला विश्वगुरू बनवायचे असेल तर, समाज आणि राष्ट्राचा विचार करणा-या तरुणांनी आघाडीतून नेतृत्व करायला हवे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (dcm Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले.
पुणे शहरात होत असलेल्या अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारीणी बैठकीच्या अंतर्गत आयोजित नागरी स्वागत समारोह कार्यक्रमात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी माजी सेनाध्यक्ष जनरल मनोज नरवणे, अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजशरण शाही, राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल,नागरी स्वागत समारोहाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष बाबासाहेब कल्याणी, स्वागत समिती सचिव बागेश्री मंठाळकर,अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री कु.अंकिता पवार, पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रा.निर्भयकुमार विसपुते व प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे आदी यावेळी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले , अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही आपल्या विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारी संघटना आहे. अभाविपच्या काश्मीर आंदोलनाने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. जीवनात संघर्ष आणि दृढते सोबतच आंदोलन मी अभाविप मध्ये शिकलो. माझ्यात नेतृत्वगुणांचा विकास अभाविप मुळे झाला. अभाविप हा एक असा मंच आहे, ज्यात अतिसामान्य तरुण अभाविप च्या कार्यपद्धती द्वारा सामुहिकता शिकतो, त्याच्यात नेतृत्वगुणांचा विकास होतो, तो सामर्थ्यवान बनतो.
मनोज नरवणे म्हणाले , प्रत्येकाने आपली मातृभाषा, राज्य भाषा, तसेच आंतरराष्ट्रीय भाषा या बरोबरच अजून एक भाषा शिकायला हवी. दूसरी भाषा शिकल्याने विविधतेमध्ये शक्ती ला बळ मिळेल. भारताची अर्थव्यवस्था चांगली प्रगती करत आहे.
अभाविप राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल म्हणाले की, पुणे प्राचीन संस्कृती सोबतच विविध महत्वपूर्ण विषयांच्या गाथा समावून आहे. पुणे भारताच्या विकासात आपली महत्वपूर्ण भूमिकेची जबाबदारी सांभाळत आहे. स्वातंत्र्यानंतर जे संकल्प अपूर्ण राहिले त्या संकल्पांना पूर्ण करणा-या शक्तीचे नाव विद्यार्थी परिषद आहे. अभाविप युवकांचा वास्तविक आवाज आहे.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी केले.