दहावी निकाल लागला; अकरावी प्रवेशाचा अर्ज भरला का? वेळापत्रक प्रसिद्ध

11 मे ते 13 मे या कालावधीत विद्यार्थी अर्जाचा पहिला भाग व दुसरा भाग तसेच व्यवस्थापन, अल्पसंख्यांक, इन हाऊस खोट्या संदर्भातील माहिती भरू शकतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी किमान एक आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांची प्राधान्याने नोंदणी करावी. 

दहावी निकाल लागला; अकरावी प्रवेशाचा अर्ज भरला का? वेळापत्रक प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून आत्तापर्यंत 7 लाख 74 हजार 918 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरला आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू असून विद्यार्थी येत्या 11 मे पासून प्रवेश अर्जातील पहिला व दुसरा भाग भरू शकतात.इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ ऑनलाइन पद्धतीनेच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरावा, असे आवाहन राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केले आहे. 

शिक्षण विभागातर्फे अकरावी प्रवेशाची शून्य फेरी 8 मे पासून सुरू झाली असून विद्यार्थी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरू शकतात. 11 मे ते 13 मे या कालावधीत विद्यार्थी अर्जाचा पहिला भाग व दुसरा भाग तसेच व्यवस्थापन, अल्पसंख्यांक, इन हाऊस खोट्या संदर्भातील माहिती भरू शकतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी किमान एक आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांची प्राधान्याने नोंदणी करावी.  तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी 14 ते 15 मे दरम्यान प्रसिद्ध केली जाईल या यादीवर 16 मे रोजी विद्यार्थ्यांना हरकती नोंदवता येतील. वीस मे रोजी रिक्त जागा प्रदर्शित केल्या जाणार आहेत. 

नियमित पहिल्या फेरीची सुरुवात 20 मे पासून सुरू होणार आहे. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक शिक्षण संचालक कार्यालयावर च्या वेब संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही पालकर यांनी स्पष्ट केले आहे.