दर तीन वर्षांनी शिक्षकांची परीक्षा घेतली पाहिजे; सुधा मूर्ती यांची सूचना
सुधा मूर्ती म्हणल्या, "शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. जर शिक्षक चांगले नसतील तर शिक्षण व्यवस्था सुधारू शकत नाही. फक्त शाळेच्या इमारती सुधारून काहीही होणार नाही, चांगले शिक्षक देखील आवश्यक आहेत. चांगले शिक्षक असल्याशिवाय केवळ चांगल्या शाळा इमारती बांधल्याने शिक्षणाचा दर्जा सुधारणार नाही."
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मूर्ती म्हणाल्या, " शिक्षकांसाठी अनेक प्रशिक्षण सत्रे आहेत, परंतु त्यामध्ये परीक्षा नाहीत. म्हणून दर तीन वर्षांनी शिक्षकांची परीक्षा घेतली पाहिजे, ज्यामध्ये नवीन अध्यापन तंत्रांचा समावेश असावा.जर एखाद्या व्यक्तीला चांगला शिक्षक व्हायचे असेल तर त्याला कठोर प्रशिक्षण आणि परीक्षा द्याव्या लागतात."