चालत्या बसमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना शिक्षकाचा  व्हिडिओ व्हायरल 

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना अत्यंत गोपनीयता बाळगावी, असा नियम असताना अशा शिक्षकाने या नियमांना हरताळ फासली आहे. नांदेड जिल्ह्यातील या शिक्षकाने चक्क चालत्या बसमध्येच उत्तरपत्रिका तपासायला सुरुवात केली. त्याचा व्हिडिओ बनवून कोणी तरी तो सोशल मिडियावर टाकल्यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

चालत्या बसमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना शिक्षकाचा  व्हिडिओ व्हायरल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

बारावीच्या परीक्षेतील काॅपी प्रकरणे (12th exam copy cases) ताजे असतानाच आता उत्तरपत्रिका तपासणीमध्ये गोपनीयतेचा भंग (Breach of confidentiality in answer sheet checking's) केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. बारावीच्या उत्तरपत्रिका तपासताना अत्यंत गोपनीयता बाळगावी, असा नियम (The rule of confidentiality) असताना अशा शिक्षकाने या नियमांना हरताळ फासली आहे. नांदेड जिल्ह्यातील या शिक्षकाने चक्क चालत्या बसमध्येच उत्तरपत्रिका तपासायला (Answer sheet checking in the bus) सुरुवात केली. त्याचा व्हिडिओ बनवून कोणी तरी तो सोशल मिडियावर टाकल्यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

उत्तरपत्रिका या गोपनीयरित्या तपासल्या जाव्यात, यासाठी राज्य शिक्षण मंडळाचे कडक नियम आहे. नांदेड येथून धर्माबादकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये एक शिक्षक बारावी बोर्डाच्या भौतिकशास्र (फिजिक्स) पेपरची उत्तरपत्रिका तपासताना आढळून आला आहे. त्याचा व्हिडिओ देखील माध्यमांच्या हाती आला आहे. 

या व्हिडीओत एका उत्तरपत्रिकेत आधी निळ्या पेनाने काहीतरी लिहून नंतर लाल पेनाने त्यावर लिहिताना हा शिक्षक दिसत आहे. उत्तरपत्रिकेचे अचूक गुणांकन होण्यासाठी ती तपासताना शिक्षकाची एकाग्रता महत्त्वाची असते. परंतु चालत्या बसमध्ये कलकलाट आणि प्रवाशांची गर्दी असतानाही या शिक्षकाने नियमभंग करीत उत्तरपत्रिका तपासल्याचे दिसत आहे. या प्रकारानंतर उत्तरपत्रिका तपासण्यात गुणवत्ता कशी राहणार? असा प्रश्न विचारला जातो आहे.
 
एखादा प्रश्न तपासायचा राहिला, तर त्याचा फटका हुशार विद्यार्थ्याला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शिक्षकाने तपासलेल्या इतरही उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन खरेच योग्यरित्या केले असेल का? असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये बारावी टर्निंग पॉईंट मानला जातो. पण काही शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत कुठलेच गांभीर्य नसल्याचे दिसून येते. त्यामुळे पुढील काळात शिक्षण विभाग अशा शिक्षकांवर काय कारवाई करणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.