मुंबई विद्यापीठाने स्वत:चे नाव लिहिले 'मुमाबाई';लाखो विद्यार्थ्यांच्या पदव्या चुकल्या
विद्यापीठाने २०२३-२४ पदवीधर बॅचच्या दीक्षांत समारंभात वाटण्यात आलेली प्रमाणपत्रे परत करण्यास सांगितले आहे. ही त्रुटी असलेली प्रमाणपत्रे आधीच अनेक संलग्न महाविद्यालयांमध्ये पोहोचली आहेत, ज्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचे हसू होत आहे. २०२३-२४ मध्ये, एकूण १.६४ लाख विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुंबईतून एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पदव्यांमध्ये स्वतःचे नाव चुकीच्या पद्धतीने छापले आहे, ( University name is printed incorrectly in the degrees awarded to students at the convocation ceremony) ज्यामुळे खळबळ उडाली आहे. पदवीवर मुलाचे नाव किंवा त्याच्या वडिलांचे नाव चुकीचे लिहिलेले असते हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण मुंबई विद्यापीठामार्फत प्रमाणपत्रावर इंग्रजीत 'मुंबई' ऐवजी 'मुमाबाई' लिहिले गेले आहे.
विद्यापीठाने २०२३-२४ पदवीधर बॅचच्या दीक्षांत समारंभात वाटण्यात आलेली प्रमाणपत्रे परत करण्यास सांगितले आहे. ही त्रुटी असलेली प्रमाणपत्रे आधीच अनेक संलग्न महाविद्यालयांमध्ये पोहोचली आहेत, ज्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचे हसू होत आहे. २०२३-२४ मध्ये, एकूण १.६४ लाख विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली, परंतु किती जणांना "मुंबई विद्यापीठ" चुकीचे लिहिलेले प्रमाणपत्र मिळाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मुंबई विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "काही प्रमाणपत्रांमध्ये छपाईच्या चुकीमुळे ही चूक झाली आहे. आम्ही त्यात सुधारणा करत आहोत. नवीन प्रमाणपत्रे कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दिली जातील."