शिक्षक माघार घेईनात! साक्षरता अभियानावरील बहिष्कार कायम, तोडगा नाहीच

राज्यातील नवसाक्षरता अभियानाअंतर्गत  शिक्षकांच्या बहिष्कार यासंदर्भात राज्यातील सर्व शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींची राज्याचे शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर यांनी सोमवारी (दि. २५) बैठक आयोजित केली होती.

शिक्षक माघार घेईनात! साक्षरता अभियानावरील बहिष्कार कायम, तोडगा नाहीच

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

राज्यात शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या भरवशावर सुरू केलेल्या नवभारत साक्षरता अभियानासमोरील (NavBharat Literacy Campaign) अडचणी कमी होताना दिसत नाहीत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने (Teachers' Organisation) या कामावर बहिष्कार टाकला असून सोमवारी शिक्षण संचालकांसोबत (Education Director) झालेल्या बैठकीतही त्यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे अभियानावर बहिष्कार कायम ठेवावा असे आवाहन संघटनेने शिक्षकांना केले आहे.

 

राज्यातील नवसाक्षरता अभियानाअंतर्गत  शिक्षकांच्या बहिष्कार यासंदर्भात राज्यातील सर्व शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींची राज्याचे शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर यांनी सोमवारी (दि. २५) बैठक आयोजित केली होती. शिक्षण संचालकांनी बाह्य यंत्रणेकडून सर्वेक्षण करून घ्यावे. मात्र, मुख्याध्यापक यांच्यावर सर्वेक्षणाचे काम करून घेण्याची जबाबदारी कायम राहील, असे सांगितले. शिक्षक  संघटनांच्या प्रतिनिधींना ही भुमिका  मान्य नसल्याने राज्यातील सर्व शिक्षक संघटनेचे प्रतिनिधी  बहिष्कारावर  ठाम आहेत, अशी माहिती मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव व सरचिटणीस राजेश सुर्वे यांनी दिली.

आता मृत्यूपेक्षा सुंदर काहीच नाही! नोकरीवरून काढलेल्या प्राध्यापिकेला हवे इच्छामरण

 

केंद्र सरकारकडून नवभारत साक्षरत कार्यक्रम देशभरात राबविला जात आहे. याअंतर्गत महाराष्ट्रात शालेय शिक्षण विभागाकडून निरक्षरांची माहिती गोळा केली जात आहे. त्याची जबाबदारी शाळांवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार गावातील शाळांमधील शिक्षकांना घरोघरी जाऊन निरक्षरांची माहिती गोळा करावी लागत आहे. शिक्षक संघटनांनी या कामावर नाराजी व्यक्त करत आक्षेप घेतला आहे.

 

शिक्षक संघटनांच्या म्हणण्यानुसार, शिक्षकांना निवडणुकीच्या कामासह अनेक शालाबाह्य कामे करावी लागत आहेत. त्यामुळे वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांकडे वेळच उरत नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी यांचे प्रमाण व्यस्त आहे. राज्यात हजारो शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यात शिक्षकांना अनेक शालाबाह्य कामे दिली जात आहेत. या उलट खासगी शाळांमधील शिक्षकांना कोणतेही सर्वेक्षणाचे काम नसते. शालाबाह्य कामामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे आम्ही सर्वेक्षणाच्या कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j