विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न आता कॉलेजमध्येच सुटणार !

शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनांविषयी येणाऱ्या अडचणी व त्यांच्या प्रश्नांचे  निराकरण महाविद्यालयस्तरावरच व्हावे. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवी, यासाठी  राज्यात महाविद्यालयस्तरावर समान संधी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न आता कॉलेजमध्येच सुटणार !
Dr. Prashant Narnavare , & Dr. Prafful Pawar

 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी (academic development of students) तसेच शासनाच्या विविध योजना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी देशात प्रथमच समाज कल्याण विभागामार्फत (Social Welfare Department ) महाराष्ट्र राज्यात 15 हजार महाविद्यालयांमध्ये (college) समान संधी केंद्र  (equal opportunity center) सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसह विविध प्रश्न आता महाविद्यालय स्तरावरच सुटणार आहेत,असे राज्याचे  समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे (Commissioner of Social Welfare Department Dr. Prashant Narnavare) यांनी सांगितले.  
        भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या ऑनलाईन पोर्टल शुभारंभ, पुणे जिल्ह्यातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या यशोगाथा या पुस्तकाच्या  प्रकाशन समारंभ प्रसंगी  डॉ. प्रशांत नारनवरे बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार ,प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त संगिता डावखर,पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी संतोष जाधव ,विशेष अधिकारी मल्लीनाथ हरसुरे,मीना आंबाडेकर आदी उपस्थित होते.
       नारनवरे म्हणाले, शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनांविषयी येणाऱ्या अडचणी व त्यांचे प्रश्न याचे  निराकरण महाविद्यालयस्तरावरच व्हावे. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवी आणि त्याबाबत  समाजामध्ये जनजागृती व्हावी, यासाठी  राज्यात महाविद्यालयस्तरावर समान संधी केंद्र सुरू करण्यात आले आहे.या केंद्रातील  प्राध्यापक, सभासद,  संबंधित महाविदयालयाचे प्राचार्य व विदयार्थी संघटनांचे प्रतिनिधी यांचेसाठी लवकरच राज्यस्तरावर संमेलन आयेाजित केले जाईल. 
  डॉ.प्रफुल्ल पवार म्हणाले, देशात उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण २७ टक्के असून  त्यात मागासवर्गीय समाजाचे प्रमाण अत्यल्प आहे.सदर परिस्थिती बदलण्यासाठी व त्यातून लोककल्याण साधण्यासाठी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये अनेक बदल करणे आवश्यक आहे. त्या बदलांसाठी समान संधी केंद्र ही अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. समाज कल्याण विभागाच्या योजनांबरोबरच समाजासाठी व विदयांर्थ्यांसाठी उपयुक्त असलेल्या सर्वच विभागाच्या योजनांची माहिती याद्वारे उपलब्ध करुन देण्यासाठी विदयापीठामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. 
--------------------------------------------