भारत- पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर 'इंस्टाग्राम' वर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारी विद्यार्थीनी निलंबित 

राष्ट्रीय एकात्मतेला बाधा ठरेल व सार्वभौमत्व, एकता व अखंडता धोक्यात आणणारी कृती होईल, असा आक्षेपार्ह SMS इन्स्टाग्रामवर पोस्ट (Offensive SMS)केल्यामुळे एका मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 भारत- पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर 'इंस्टाग्राम' वर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारी विद्यार्थीनी निलंबित 

एज्युवार्ता  न्यूज नेटवर्क 

भारत पाकिस्तान युद्धाच्या (India-Pakistan war)पार्श्वभूमीवर समाज माध्यमांवर प्रसारित केल्या जाणाऱ्या विविध व्हिडिओ व मजकुरावर पोलीस प्रशासनाचे करडी नजर आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय एकात्मतेला बाधा ठरेल व सार्वभौमत्व, एकता व अखंडता धोक्यात आणणारी कृती होईल, असा आक्षेपार्ह SMS इन्स्टाग्रामवर पोस्ट (Offensive SMS)केल्यामुळे पुण्यातील कोंढवा परिसरातील एका मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थिनी पुण्यातील नामांकित इंजिनिअरिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनी (Engineering college student)असून  तिच्यावर या प्रकरणी महाविद्यालयाने निलंबनाची कारवाई केली आहे.

समाज माध्यमावर फिरणारा आक्षेपार्ह एसएमएस स्वत:च्या इन्स्टाग्राम आकाऊटवरून पोस्ट केल्या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका मुली विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.ही घटना समजल्यानंतर शहरातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थीवर महाविद्यालय प्रशासनाने निलंबाची कारवाई केली आहे.

संबंधित मुलीने धर्म व समाजात द्वेष भावना वाढेल. तसेच राष्ट्रीय एकात्मतेला बाधा ठरेल व सार्वभौमत्व, एकता व अखंडता धोक्यात आणणारी कृती होईल, अशा दृष्टीने हा एसएमएस समाज माध्यमावर पोस्ट केल्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.