दोन्ही हात नसलेला विद्यार्थी देतोय बारावीची परीक्षा, पायाच्या बोटांमध्ये पेन धरून लिहतोय पेपर 

जन्म झाल्यापासून दोन्ही हात नसतानाही एका विद्यार्थ्याने हार न मानता पायाच्या बोटांनी बारावीची परीक्षा देत सर्वांना प्रेरणा दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील शिवाजी कॉलेजमध्ये शिकणारा सुरज शिवराज उबाळे हा विद्यार्थी सध्या बारावीची परीक्षा देत आहे. त्याच्या या जिद्दीमुळे सर्वत्र कौतूकाचा वर्षाव होत आहे. 

दोन्ही हात नसलेला विद्यार्थी देतोय बारावीची परीक्षा, पायाच्या बोटांमध्ये पेन धरून लिहतोय पेपर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सध्या राज्यात उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Board of Higher Secondary Education) इयत्ता बारावीच्या परीक्षा (Class 12th Board Exam) घेतल्या जात आहेत. या परीक्षेदरम्यान एक कौतूकास्पद घटना पाहायला मिळाली. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही अडचण आड येत नाही याचे जिवंत उदाहरण नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. जन्म झाल्यापासून दोन्ही हात नसतानाही एका विद्यार्थ्याने हार न मानता पायाच्या बोटांनी बारावीची परीक्षा (A disabled student is appearing for the 12th standard exam) देत सर्वांना प्रेरणा दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील शिवाजी कॉलेजमध्ये (Shivaji College Kandahar) शिकणारा सुरज शिवराज उबाळे हा विद्यार्थी (Suraj Shivraj Ubale is a student) सध्या बारावीची परीक्षा देत आहे. त्याच्या या जिद्दीमुळे सर्वत्र कौतूकाचा वर्षाव होत आहे. 

सुरज हा नांदेड शहराजवळील गाडेगाव गावचा रहिवासी आहे. जन्मतःच दोन्ही हात नसल्यामुळे त्याला दैनंदिन कामांसाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, लहानपणापासूनच त्याने परिस्थितीशी दोन हात करत पायाच्या बोटांनी लिहिण्याचा सराव केला. शालेय जीवनातही सुरजने पायानेच लेखन करत शिक्षण पूर्ण केले. आता बारावीच्या महत्त्वाच्या टप्प्यावरही त्याने कोणतीही विशेष सवलत न मागता स्वतःच्या पायाने उत्तरपत्रिका लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. 

परीक्षा केंद्रावर तो आत्मविश्वासाने पायाच्या बोटांमध्ये पेन धरून पेपर लिहिताना दिसत आहे. सुरजच्या या जिद्दीचे शिक्षक, मित्रपरिवार आणि जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे. त्याच्या धैर्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन शिक्षक बनण्याचे त्याचे स्वप्न आहे. माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी करायचे आहे, असे त्याने म्हटले आहे.