सर,मला शिकायचंय, लग्न नको, १०वी च्या विद्यार्थिनीची मुख्याध्यापकांकडे आर्त हाक

मुख्याध्यापकांनी देखील तत्परता दाखवून होणारा हा बालविवाह रोखण्यासंदर्भात ग्रामस्तरीय बाल संरक्षण समितीला कळवलं. आज बाल संरक्षण समिती व महिला बाल विकास मुख्याध्यापकांनी विभागाच्या चाइल्ड हेल्पलाइनने या मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यांचे समुपदेशन केलं. सध्या ही मुलगी दहावीच्या वर्गात शिकत असून तिची सराव परीक्षा देखील सुरू आहे.

सर,मला शिकायचंय, लग्न नको, १०वी च्या विद्यार्थिनीची मुख्याध्यापकांकडे आर्त हाक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

ग्रामीण भागात अनेकदा मुलींना मनासारखे शिक्षण घेता येत नाही. कमी वयातच त्यांची लग्न उरकली जातात. परंतु हिंगोली जिल्ह्यातील एका पंधरा वर्षीय मुलीने मात्र धाडस दाखवत आपला होणारा बालविवाह (Child marriage) रोखण्यासाठी थेट शाळेच्या मुख्याध्यापकांनाच पत्र (Letter to the principal) लिहून विनंती केली. मला शिकायचं आहे.परंतु, घरच्यांनी माझे लग्न पंचवीस वर्षीय मुलाशी ठरवलं (Married to a twenty-five year old boy) आहे. मला आत्ताच लग्न करायचे नाही, माझे लग्न थांबवा, अशी आर्त आशयाचे पत्र तिने आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिले आहे. 

हेही वाचा - बुलढाण्यातील जिल्हा परिषद शाळेची गणितात जागतिक झेप

मुख्याध्यापकांनी देखील तत्परता दाखवून होणारा हा बालविवाह रोखण्यासंदर्भात ग्रामस्तरीय बाल संरक्षण समितीला कळवलं. आज बाल संरक्षण समिती व महिला बाल विकास मुख्याध्यापकांनी विभागाच्या चाइल्ड हेल्पलाइनने या मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यांचे समुपदेशन केलं. सध्या ही मुलगी दहावीच्या वर्गात शिकत असून तिची सराव परीक्षा देखील सुरू आहे. त्याला शिक्षण घेऊन स्वबळावर उभे राहिल्यानंतर लग्न करायचे आहे. 

प्रशासन बालविवाह रोखण्यासंदर्भात गावागावात जनजागृती करत आहे. या जनजागृतीमुळे व शिक्षणाच्या लागलेल्या गोडी मुळे या मुलीने घरच्यांच्या विरोधात जात धाडस दाखवले.  मुख्याध्यापकांना ही बाब कळवल्यामुळे हा होणारा बालविवाह रोखण्यास मदत झाली आहे. आता ग्रामस्तरीय बाल संरक्षण समितीकडून हे प्रकरण जिल्हा बालकल्याण समितीकडे जाणार आहे. 

बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार 18 वर्षांखालील मुलीचे लग्न लावणे हा गंभीर गुन्हा आहे. प्रशासनाकडून या संबंधित मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. बालविवाहाचे दुष्परिणाम आणि मुलीच्या शिक्षणाचे महत्त्व पालकांना पटवून देऊन हा विवाह रद्द करण्यात आला आहे. मुलींच्या शिक्षणाचे खंडित होऊ देणार नाही आणि हा बालविवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली आहे.