11th Admission : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीच्या नोंदणीला सुरूवात
आता दुसरी नियमित फेरी सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांना १३ जुलै २०२५ पर्यंत नवीन नोंदणी आणि प्रवेश अर्जाच्या भाग-२ मधील पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. दुसऱ्या नियमित फेरीच्या पहिल्या दिवशी राज्यभरातून ८ हजार ११७ विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केली. तसेच २ लाख १३ हजार ९७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग २ मध्ये पसंतीक्रम भरला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मागील काही दिवसांपासून अकरावी प्रवेशाच्या (11th admission process) दुसर्या फेरीची वाट पहाणार्या विद्यार्थ्यांची अखेर प्रतीक्षा संपली आहे. शिक्षण विभागाने अकरावी दुसऱ्या फेरीला आता सुरुवात (Second round start) झाली आहे. त्यानंतर पहिल्याच दिवशी राज्यभरातून ८ हजार ११७ विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी (8 thousand 117 students registered for new registration) केली. तसेच २ लाख १३ हजार ९७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग २ मध्ये पसंतीक्रम भरला आहे.
संपूर्ण राज्यात इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रथमच राबविण्यात येत आहेत. आता दुसरी नियमित फेरी सुरू करण्यात आली असून विद्यार्थ्यांना १३ जुलै २०२५ पर्यंत नवीन नोंदणी आणि प्रवेश अर्जाच्या भाग-२ मधील पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. दुसऱ्या नियमित फेरीच्या पहिल्या दिवशी राज्यभरातून ८ हजार ११७ विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केली. तसेच २ लाख १३ हजार ९७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग २ मध्ये पसंतीक्रम भरला आहे.
अमरावती विद्यापीठात 'कॅरिऑन पद्धत' लागू, विद्यार्थ्यांना थेट अंतिम वर्षात प्रवेश
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीची मुदत ७ जुलै रोजी संपली. या फेरीमध्ये राज्यभरातून ५ लाख ८ हजार ९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. पहिल्या फेरीमध्ये विज्ञान शाखेतून सर्वाधिक १ लाख ४ हजार १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर त्याखालोखाल वाणिज्य शाखेतून ५८ हजार ९४८ आणि कला शाखेतून ३१ हजार १५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर १ लाख २४ हजार ९८ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले आहेत.
यातील पहिल्या पसंतीचे महाविद्यालय जाहीर झालेल्या विद्यार्थी वगळता सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच १ हजार ९४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन रद्द केले, यामध्ये कोट्यांतर्गत प्रवेश घेऊन रद्द केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३६१ इतकी आहे. त्याचप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयांनी ६ हजार ४०२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले.