MPSC प्रलंबित निकालाचा मुद्दा सभागृहात गाजला, कालमर्यादा लागू होणार?

निकाल प्रक्रियेतील विलंबामुळे हजारो विद्यार्थ्यांचे मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे. UPSC जिथे निकाल 20 दिवसांत जाहीर करते, तिथे MPSC अनेक महिने निकाल प्रलंबित ठेवते. MPSC ला निकालासाठी कालमर्यादा बंधनकारक करावी, अशा मागणी हेमंत रासणे यांनी विधानसभेच्या सभागृहात केली आहे.

MPSC प्रलंबित निकालाचा मुद्दा सभागृहात गाजला, कालमर्यादा लागू होणार?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission) भरती प्रक्रियेत होणाऱ्या दिरंगाईवर (Delay in recruitment process) आज विधानसभेत आमदार हेमंत रासणे (MLA Hemant Rasane) यांनी आवाज उठवल्याचे दिसून आले. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून उमेदवाराची नियुक्ती होण्यासाठी तीन-तीन, चार-चार वर्षे लागत आहेत. जानेवारी 2023 मध्ये सुरू झालेली ७ हजार ७ जागांसाठीची गट-क लिपिक व टंकलेखक भरती प्रक्रिया (Clerk and Typist Recruitment Process Result) अद्याप जुलै 2025 पर्यंतही पूर्ण झालेली नाही. निकाल प्रक्रियेतील विलंबामुळे हजारो विद्यार्थ्यांचे मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे. UPSC जिथे निकाल 20 दिवसांत जाहीर करते, तिथे MPSC अनेक महिने निकाल प्रलंबित ठेवते. MPSC ला निकालासाठी कालमर्यादा बंधनकारक करावी, अशा मागणी हेमंत रासणे यांनी विधानसभेच्या सभागृहात केली आहे.

11th Admission : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीच्या नोंदणीला सुरूवात

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणार पुणे शहर, या शहरातील मध्यवर्ती भागात म्हणजेच कसबा मतदारसंघांमध्ये शेकडो अभ्यासिकांच्या माध्यमातून हजारो स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असतात. स्पर्धा परीक्षा करत असताना त्यांना अनेकदा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातीलच एक म्हणजे आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा निकाल वेळेवर न लागणे अथवा या निकालाच्या प्रक्रियेला विलंब होणे. या संदर्भात आज विधानसभा सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न हेमंत रासणे यांनी मांडले.

उत्तरदायित्व निश्चित करणारी समिती/लोकपाल नियुक्त करावा. UPSC च्या धर्तीवर MPSC प्रतिभा सेतू व पारदर्शक वेळापत्रक पोर्टल सुरू करावे, तसेच विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्रीय व कायदेशीर सल्ला केंद्र स्थापन करावे, अशा मागणी रासणे यांनी केली. त्यांच्या या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री आशिष शेलार यांनी टंकलेखक परीक्षेचा निकाल लागण्यासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाची अधिकृत प्रत मिळताच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे पुढील काळात एमपीएससी भरती प्रक्रियेला गती मिळण्यात शक्यता आहे.