विद्यार्थ्यांना नापास करणाऱ्या प्राध्यापकांना शिक्षा ; परीक्षेत दिले चुकीचे गुण 

प्राध्यापकांनी एकाच महाविद्यालयातील तब्बल १०० ते २९० विद्यार्थ्यांचे निकाल चुकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्यामुळे विद्यापीठाने त्यांना दंड ठोठावला आहे.

विद्यार्थ्यांना नापास करणाऱ्या प्राध्यापकांना शिक्षा ; परीक्षेत दिले चुकीचे गुण 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) विविध विषयांच्या परीक्षांचे अंतर्गत गुण व प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण देताना चूका (Wrong marks given) करणाऱ्या  प्राध्यापकांना (professor) विद्यापीठाच्या समितीने  (Examination Department) पाच हजार रुपयांपर्यंत दंड केला आहे.राजमाता जीजाऊ शिक्षण प्रसारक मंडळीचे भोसरी कॉलेज (Bhosari College), जुन्नर येथील समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिटयूशनचे (Samarth Group of Institutions) कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, दौंड तालुक्यातील वरवंड येथील एकनाथ सीताराम दिवेकर कॉलेजच्या (Eknath Sitaram Divekar College at Warvand) प्राध्यापकांनी तब्बल १०० ते  २९०  विद्यार्थ्यांचे निकाल चुकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : विद्यापीठांच्या परीक्षा आणि निकालांसाठीही खाजगी कंपन्या?

पुणे विद्यापीठातर्फे एप्रिल / मे २०२३ या सत्रातील परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यात अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अंतर्गत / एक्सटर्नल व प्रॅक्टिकलचे गुण भरण्याचे राहून गेल्याचे समोर आले. त्यात काही प्राध्यापकांकडून चुकीचे गुण भरले गेले.तर काहींकडून गुण भरण्यात त्रुटी राहून गेल्या. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रमाद समितीमध्ये या प्रकरणी सुनावणी घेऊन संबंधित प्राध्यापकांवर कारवाई केली. तसेच विद्यापीठाच्या समितीने दिलेल्या शिक्षेची महाविद्यालयाने योग्य ती पूर्तता करून केलेल्या कार्यवाहीचा पूर्तता अहवाल परीक्षा विभागास सादर करावा,आशा सूचना दिल्या. तसेच या पुढील काळात अशाच चुका केल्यास कठोर कारवाई केली जाईल,अशी समाज दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या प्राध्यापकांची कोणतीही गय केली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजमाता जीजाऊ शिक्षण प्रसारक मंडळीच्या भोसरी कॉलेजच्या २९० विद्यार्थ्यांना क्रेडिट गुण न दिल्याने प्राध्यापिका जयश्री अरमानी यांना  ५००० हजार रुपये तर जुन्नर येथील समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिटयूशनचे  कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयांच्या प्राध्यापिका रोहिणी रोटे यांनी २०० विद्यार्थ्यांचे टर्म वर्क मार्ग आपलोड न केल्याने त्यांनाही ५००० हजार रुपये दंड ठोठावला आहे. नाशिक येथील कर्मवीर अॅड.बाबुराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे कुबेर भुसाळ यांनी विद्यार्थ्यांना ५० पैकी गुण देणे अपेक्षित असताना २५ पैकी गुण दिले. तसेच चाकण शिक्षण मंडळाच्या आर्टस अँड कॉमर्स कॉलेजच्या प्रा. सोपान घोळवे यांनी ४७ विद्यार्थ्यांचे गुण आपलोडच केले नाहीत. त्यामुळे त्यांना  ५००० हजार रुपये दंड केला.

विद्यापीठाने ३० सप्टेंबर रोजी ३७ पानी परिपत्रक काढून परीक्षेच्या कामात चूका केलेल्या संबंधित महाविद्यालयांची व  प्राध्यापकांची यादीच प्रसिध्द केली आहे.तसेच निकालात त्रुटी राहिल्या विद्यार्थ्यांची संख्या प्रसिध्द केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेंडी येथील एटीईएस कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील ५३ ,वसंतराव रनसिंग कॉलेज कळंब , ता . इंदापूर येथील ४०  , मालेगाव कॉलेज मधील ३८  विद्यार्थ्यांच्या निकालात चुका झाल्या आहेत. पुण्यातील नामांकित महाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणा-या वाडिया कॉलेज, गरवारे कॉलेज,स.प.महाविद्यालयासह हडपसर येथील एस.एम.जोशी कॉलेज आदी  महाविद्यालय व प्राध्यापकांची यादी सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

दरम्यान, विद्यापीठाशी संलग्न ७८ महाविद्यालयांची यादी विद्यापीठाने प्रसिध्द केली आहे. त्यातील काही प्राध्यापक प्रमाद समितीसमोर हजर होते.उर्वरित प्राध्यापकांना बुधवारी (दि.४) प्रमाद समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे बुधवारी इतरही काही प्राध्यापकांना शिक्षा देण्यात आली असल्याचे परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.