बारावीच्या निकालात ९वी, १०वी, ११ वीच्या गुणांचा उल्लेख; परखकडून सूचना
एनसीईआरटीचे (NCERT) यूनिट परखने ९वी, १०वी, ११वी च्या गुणांच्या आधारावर १२ वीचा निकाल तयार करण्याचे सुचवले आहे. एनसीईआरटीने रिपोर्ट कार्डमध्ये नवा फाॅर्मुला देखील केला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
एनसीईआरटीचे (NCERT) यूनिट परख (Unit PARAKH) कडून ९वी, १०वी, ११वी च्या गुणांच्या आधारावर बारावीचा निकाल (12th result based on 9th, 10th, 11th marks) तयार करण्याचे सुचवले आहे. एनसीईआरटीने रिपोर्ट कार्डचा नवा फाॅर्मुला देखील तयार केला आहे. यामध्ये ९वी, १०वी आणि ११वी चे गुण हे १२वीच्या निकालामध्ये देण्यात यावेत, अशी शिफारस केली (was recommended) आहे. तसेच याच आधारावर १२वीचा निकाल तयार केला जावा, असेही सुचवण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, शिक्षण मंत्रालयाला हा रिपोर्ट सुपूर्द करण्यात आला आहे. यामध्ये ९वी १०वी आणि ११ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारावर बारावीचा निकाल तयार केला पाहिजे. जर या तीन वर्गात विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले आणि ते वर्गात नियमीत असतील तर त्यांना याचा फायदा बारावीच्या निकालामध्ये मिळाला पहिजे. NCERT चे यूनिट परखने याबद्दलची शिफारस केली आहे. परखची स्थापना मागिल वर्षी करण्यात आली आहे.
हा रिपोर्ट केंद्रीय शिक्षण मंत्रालय सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांसोबत चर्चेला ठेवणार आहे. जेणेकरून सर्व आपले म्हणणे मांडू शकतील, तसेच सर्वांची सहमती मिळाल्यानंतर हा रिपोर्ट लागू केला जाईल. या शिफारसीबद्दल मागील एक वर्षात ३२ शालेय शिक्षण मंडळांसोत चर्चा करण्यात आली आहे.
PARAKH च्या रिपोर्टमध्ये शिफारस करण्यात आली आहे की, विद्यार्थ्यांच्या ९वी, १०वी आणि ११वीच्या वर्गातील कामगिरीच्या आधारावर त्यांचा १२वीचा निकाल जाहीर केला पाहिजे. १२वीच्या निकालात ९वीचे १५ टक्के, १० वीचे २० टक्के आणि ११ वीचे २५ टक्के व्हेटेज देण्यात यावे,असेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. यासोबतच १२वीच्या गुणपत्रिकेत संयुक्त मुल्यांकन फॉर्मेटिव्ह असेसमेंट (होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, ग्रुप डिस्कशन, प्रोजेक्ट) आणि समेटिव्ह असेसमेंट (टर्म एक्झाम) यांना देखील व्हेटेज असेल, असे म्हटले आहे.