नांदेड हादरले! दप्तरात लपवून चाकू आणला अन् भर शाळेतच केले मित्रावर सपासप वार

गेल्या काही दिवसांपासून १५ ते १६ वर्षे वयोगटातील या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. याच वादाचा राग मनात धरून दोन विद्यार्थ्यांनी घरातून निघतानाच शाळेच्या दप्तरात लववून चाकू आणला होता. शाळेची जेवणाची सुटी होताच त्यांनी संबंधित वर्गमित्राला फूस लावून शाळेजवळील मंदिराच्या पाठीमागे नेले. तिथे बाचाबाची झाल्यानंतर त्यांनी चाकू काढून गळ्यावर आणि पोटात वार केले.

नांदेड हादरले! दप्तरात लपवून चाकू आणला अन् भर शाळेतच केले मित्रावर सपासप वार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नांदेड जिल्ह्यातील (Nanded Crime News) असर्जन येथील शंकरराव चव्हाण विद्यालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी (Students studying in the 10th) शुल्लक वादातून आपल्याच वर्गमित्रावर चाकूने जीवघेणा हल्ला (Lethal knife attack on classmate) केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू (The student is undergoing treatment at the hospital) असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून १५ ते १६ वर्षे वयोगटातील या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. याच वादाचा राग मनात धरून दोन विद्यार्थ्यांनी घरातून निघतानाच शाळेच्या दप्तरात लववून चाकू आणला होता. शाळेची जेवणाची सुटी होताच त्यांनी संबंधित वर्गमित्राला फूस लावून शाळेजवळील मंदिराच्या पाठीमागे नेले. तिथे बाचाबाची झाल्यानंतर त्यांनी चाकू काढून गळ्यावर आणि पोटात वार केले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विद्यार्थ्याचा आवाज ऐकून शाळेतील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने हल्ला करणाऱ्या दोन्ही अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती देताना नांदेडचे पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी चिंता व्यक्त केली. लहान मुलांमध्ये सोशल मीडियावरील हिंसात्मक रील्स आणि थरारक व्हिडिओ पाहण्याचे प्रमाण वाढले असून त्याचा बालमनावर वाईट परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. यातूनच राग आणि हिंसेची भावना अनावर होऊन अल्पवयीन मुले अशी टोकाची पावले उचलत आहेत, असे ते म्हणाले.

या प्राणघातक हल्ल्याने नांदेड जिल्हा हादरला आहे. शाळेतील मुलांच्या हातातील स्मार्टफोन, सोशल मीडियाचा अतिवापर आणि बदलत्या वर्तनावर पालक व शाळा प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. नांदेड ग्रामीण पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.