MHT-CET २०२६ मध्ये NEETसारखा महाघोटाळा? ४० टक्के गुणांवर ९९ पर्सेंटाइल, शिक्षकांच्या व्हिडिओने खळबळ

NEET घोटाळ्यानंतर आता राज्यातील CET परीक्षेवरही शंका घेतली जात आहे. बारावीच्या कमी गुणांवर उच्च पर्सेंटाइल मिळणे हे नैसर्गिकरित्या अवघड असल्याचे मत अनेक शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यामुळे विद्यार्थी, पालक आणि विरोधकांमध्ये संताप वाढला आहे.

MHT-CET २०२६ मध्ये NEETसारखा महाघोटाळा? ४० टक्के गुणांवर ९९ पर्सेंटाइल, शिक्षकांच्या व्हिडिओने खळबळ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 MHT-CET २०२६ परीक्षेत मोठा घोटाळा (MHT-CET 2026 exam.) झाल्याचे आरोप राज्यात जोरदार चर्चेत आले आहेत. NEET पेपरफुटीविरोधात देशभर आंदोलन (NEET paper leak) करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) प्रयत्नांनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.(Dharmendra Pradhan has resigned) त्याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात MHT-CET परीक्षेत अनियमिततेचे गंभीर आरोप  (MHT-CET exam) करण्यात येत आहेत. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव सचिन सावंत यांनी यासंदर्भात पहिले भाष्य केले. बारावीत केवळ ३५ ते ४० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना CET मध्ये ९० ते १०० पर्सेंटाइल कसे मिळाले, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. 

सचिन सावंत यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सरकारवर निशाणा साधला. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महादेव बालगुडे यांनी मोठी खळबळ उडवली. त्यांनी एक्स (ट्विटर) वर एका शिक्षकाचा व्हिडिओ शेअर केला, ज्यात MHT-CET २०२६ मधील कथित घोटाळ्याबाबत सविस्तर भाष्य करण्यात आले आहे. या व्हिडिओसह शिक्षकाच्या युट्यूब चॅनलची लिंकही शेअर करण्यात आली. बालगुडे यांच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले असून, परीक्षा पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

NEET घोटाळ्यानंतर आता राज्यातील CET परीक्षेवरही शंका घेतली जात आहे. बारावीच्या कमी गुणांवर उच्च पर्सेंटाइल मिळणे हे नैसर्गिकरित्या अवघड असल्याचे मत अनेक शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यामुळे विद्यार्थी, पालक आणि विरोधकांमध्ये संताप वाढला आहे. परीक्षेच्या निकाल प्रक्रिया, मूल्यमापन पद्धती आणि संपूर्ण यंत्रणेची चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

राज्यातील अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी MHT-CET निकाल महत्त्वाचा असतो. अशा स्थितीत घोटाळ्याचे आरोप समोर आल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या या प्रकरणात सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, विरोधकांकडून सातत्याने चौकशीची मागणी केली जात आहे. या आरोपांची सखोल तपासणी होऊन दोषींवर कारवाई झाल्यासच परीक्षेची विश्वासार्हता टिकू शकेल.