TET Exam: 'टीईटी' पेपरफुटी प्रकरणात आरोपींवर मकोका लावला जाणार; शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा
पोलिसांना मिळालेल्या धागेदोर्यांवरून तपास महाराष्ट्राबाहेरील गुप्त छापखान्यांपर्यंत पोहोचला आहे. तसेच टीईटी पेपरफुटीलीत दोषींवर माकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी (TET Paper Leak) प्रकरणाने महाराष्ट्राच्या शिक्षण खात्याला मोठा धक्का बसला आहे. NEET पेपरफुटीमुळे आधीच विद्यार्थी आणि पालकांमध्ये रोष (Outrage among parents) निर्माण झाला असताना, आता शिक्षकांच्या पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने सरकारविरोधात असंतोष वाढला आहे. मात्र, राज्य सरकारने याप्रकरणी कठोर भूमिका घेतली असून, आरोपींवर महाराष्ट्र नियंत्रण संघटना कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई (Makoka action) करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे (Education Minister Dada Bhuse) यांनी केली आहे.
परीक्षा होण्यापूर्वी भिवंडी पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून टीईटीची प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आली. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एसआयटी गठित करण्यात आली आहे. पोलीस सह आयुक्त यांच्या नेतृत्वाखालील या टीममध्ये चार विशेष पथके तयार करून बिहार, हरियाणा आणि दिल्ली येथे पाठवण्यात आली आहेत. जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेवरील नंबरच्या आधारे पेपरची साखळी उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असल्याची माहिती भुसे यांनी दिली.
मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले की, “दोषींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल. परीक्षा पारदर्शक व्हावी यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत.” पेपरफुटीमुळे रद्द झालेली टीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून, यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या ही परीक्षा शिक्षक निवडीसाठी घेतली जात असून, २०२८ पर्यंत विद्यमान शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. प्रश्नपत्रिका गोपनीय छापखान्यात तयार होतात आणि पोलीस संरक्षणात वितरित केल्या जातात, तरीही फुटी झाल्याचे प्रकरण गंभीर असल्याचे मंत्री म्हणाले. सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करून परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेण्यात येणार आहे.
लोकशाहीत विरोधकांना आंदोलन करण्याचा अधिकार असला तरी, सरकारने स्वतःहून कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे भुसे यांनी नमूद केले. पोलिसांना मिळालेल्या धागेदोर्यांवरून तपास महाराष्ट्राबाहेरील गुप्त छापखान्यांपर्यंत पोहोचला आहे. तसेच टीईटी पेपरफुटीलीत दोषींवर माकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले.
टीईटी पेपरफुटी प्रकरणाने शिक्षण क्षेत्रातील सिस्टमिक कमकुवतपणा उघड केला आहे. सरकारने जाहीर केलेल्या पावलांमुळे विद्यार्थी आणि पालकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी, एसआयटीच्या तपासातून दोषींना शिक्षा होईपर्यंत आणि परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होईपर्यंत जनतेच्या मनातील संशय कायम राहील.