साहित्यिक प्रदीप कोकरे, शिक्षणतज्ञ डॉ. सुरेश सावंत यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर 

मुलांसाठी लिहितांना बालसाहित्यिकांना स्वत: मूल होऊन जगावं लागतं. मुलांचं मनोरंजन करतांना त्यांचं ज्ञानार्जनही होईल याकडे लक्ष द्यावं लागतं. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रयोगशील शिक्षणतज्ञ असल्याने डॉ. सुधीर सावंत यांनी ही किमया लीलया साधली आहे. त्यामुळेच त्यांचं लेखन प्रभावी ठरत आहे. 

साहित्यिक प्रदीप कोकरे,  शिक्षणतज्ञ डॉ. सुरेश सावंत यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

साहित्यिक प्रदीप कोकरे (Literary Pradeep Kokare) यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’  मराठी कादंबरीस ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ तसेच बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत (Educationist Dr. Suresh Sawant) यांच्या ‘आभाळमाया’ काव्यसंग्रहास ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. साहित्य अकादमीने २३ भाषांतील यंदाच्या (Awards announced) युवा आणि वाङमय पुरस्कारांची घोषणा केली. 

 मुलांसाठी लिहितांना बालसाहित्यिकांना स्वत: मूल होऊन जगावं लागतं. मुलांचं मनोरंजन करतांना त्यांचं ज्ञानार्जनही होईल याकडे लक्ष द्यावं लागतं. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रयोगशील शिक्षणतज्ञ असल्याने डॉ. सुधीर सावंत यांनी ही किमया लीलया साधली आहे. त्यामुळेच त्यांचं लेखन प्रभावी ठरत आहे. 

उच्च माध्यमिक शाळेच्या स्तरावर अध्यापन आणि नंतरच्या काळात मुख्याध्यापक या नात्याने प्रशासकीय जबाबदारी पार पाडतानाच डॉ. सावंत यांनी कथा, कविता, कादंबरी, चरित्र, समीक्षा, संशोधन आणि संपादन इत्यादी वाङमय प्रकारांत विपुल लेखन केले, पण बालसाहित्य आणि बालशिक्षण, तसेच लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम हे त्यांचे आस्थाविषय राहिले आहेत. त्यांची बालसाहित्यातील ३३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यापूर्वी त्यांच्या तीन पुस्तकांना राज्य शासनाचे वेगवेगळे पुरस्कार प्राप्त झाले होते. शिक्षक, मुख्याध्यापक या नात्याने त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची नोंद घेत राष्ट्रपती पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली होती.

कादंबरीकार प्रदीप कोकरे हे वास्तवदर्शी लेखक असून समाजातील गरीबी, बेरोजगारी, दुर्बल, उपेक्षित घटकांचं जीवनदर्शन त्यांच्या साहित्यात घडतं. त्यांचं लेखन हे सामाजिक प्रश्नांना थेट भिडणारं, त्यावर परखड भाष्य करणारं असतं. त्यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’  कादंबरीस जाहीर झालेला ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ हा मराठी साहित्य क्षेत्राचाही गौरव असून तो आपल्या सर्वांना समाजाकडे पाहण्याचा एक वेगळा आरसा तयार झाला आहे. 
_____________________________________________

साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी भाषा साहित्यिक, सांस्कृतिकदृष्ट्या अधिक समृद्ध होण्यास मदत होईल. नवीन पिढी मराठी साहित्याकडे आकर्षित होईल. 

- अजित पवार, उपमुख्यमंत्री