LLB चा कट-ऑफ वाढणार; पदवीसाठी विद्यार्थ्यांची चुरस

एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमाच्या उपलब्ध जागांच्या तुलनेत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही तीन पटीने असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. तसेच मागील गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाविद्यालयांचा कट-ऑफ देखील अधिक राहण्याची चिन्हे आहेत.

LLB चा कट-ऑफ वाढणार; पदवीसाठी विद्यार्थ्यांची चुरस

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

कायद्याच्या पदवी अभ्यासक्रमासाठी यंदा विद्यार्थ्यांची मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. ३ वर्षे एलएलबी प्रवेशासाठी (LLB 3 years course) आत्तापर्यंत ५१ हजार ३३४ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी (51 thousand 334 students registered) केली आहे. राज्यभरात ३ वर्षे एलएलबी अभ्यासक्रमासाठी अंदाजे २१ हजार जागा उपलब्ध (21 thousand seats available) आहेत. मात्र, प्रवेशासाठी यंदा विक्रमी ५१ हजार एवढे अर्ज आले आहेत. त्यामुळे महाविद्यालयाचा कट-ऑफ (College cut-off will increase) मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमाच्या उपलब्ध जागांच्या तुलनेत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही तीन पटीने असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. तसेच मागील गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाविद्यालयांचा कट-ऑफ देखील अधिक राहण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही वर्षात एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नोकरी अथवा उद्योग-व्यवसाय सांभाळून अनेक जण उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी एलएलबीचा पर्याय निवडत असल्याचे चित्र आहे. त्यातून या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. परिणामी प्रवेशासाठी चुरसही वाढली आहे.

दुसरीत शिकणाऱ्या ८ वर्षाच्या विद्यार्थ्याची दोन मित्रांनी गळा दाबून केली हत्या

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. सीईटी सेलने एलएलबीच्या कॅप फेरीसाठी अर्ज भरण्यास ३० जूनला सुरुवात केली होती. त्याची मुदत सोमवारी संपली. यंदा एलएलबीच्या अभ्यासक्रमासाठी ५७ हजार ८९२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ५१ हजार ३३४ विद्यार्थ्यांनी सर्व माहिती भरून अर्ज अंतिम केला आहे, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली. गेल्यावर्षी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २१ हजार ७१ जागा उपलब्ध होत्या. त्यावेळी २० हजार ३७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते. त्यातून बहुसंख्य कॉलेजांतील जागा भरल्या गेल्या होत्या. यंदाही एलएलबीसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने प्रवेशासाठी चुरस असण्याची शक्यता आहे.