अमेरिका, चीनच्या पलीकडे भारताने आपला स्वतंत्र मार्ग निवडावा

महासत्ता होण्यासाठी चीनकडून होणारे प्रयत्नात नाविन्यता नाही हीच त्यांची कमकुवत बाब आहे. भारताने आपली अर्थव्यवस्था मजबूत करत जागतिक आपले स्थान प्रस्थापित करण्यासाठी नवे मार्ग निवडण्याची गरज असल्याची चर्चा यावेळी करण्यात आली.

अमेरिका, चीनच्या पलीकडे भारताने आपला स्वतंत्र मार्ग निवडावा
विद्यापीठात आयोजित संवाद परिषदेत विचार मांडताना डॉ.विजय खरे

पुणे : दुसऱ्या महायुद्धनंतर ज्याप्रकारे अमेरिकेने America जागतिक नेतृत्व करण्यासाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे आता चीनकडून China सध्या असे प्रयत्न केले जात आहेत.मात्र,भारताने India या दोन्ही देशांच्या पावलावर पाऊल न ठेवता आपला स्वतंत्र धोरणात्मक मार्ग निवडावा, असा सूर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात University of Pune आयोजित संवाद परिषदेत उमटला. (शिक्षण बातम्यांसाठी eduvarta.com ला भेट द्या)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात  'चीनचा उदय आणि त्याचे जागतिक परिणाम '  या विषयावर परिषद संपन्न झाली. त्यात भारताने स्वतंत्र मार्ग स्वीकारावा असा सुरू उमटला.  या परिषदेचे उद्घाटन लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ विजय खरे यांच्यासह या विषयातील २० हून अधिक तज्ज्ञ मंडळी सहभागी झाली होती. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात चीनचे धोरण, चीनची तैवान वरील भूमिका व दक्षिण चीन सागरातील चीनच्या भौगोलिक विस्तारासाठी सुरू असलेल्या हालचाली.भारतावर वैचारिक प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेले चीनचे प्रयत्न आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महासत्ता होण्यासाठी चीनकडून होणारे प्रयत्नात नाविन्यता नाही हीच त्यांची कमकुवत बाब आहे. भारताने आपली अर्थव्यवस्था मजबूत करत जागतिक आपले स्थान प्रस्थापित करण्यासाठी नवे मार्ग निवडण्याची गरज असल्याची चर्चा यावेळी करण्यात आली. बॉलिवूड आणि समाजमाध्यमे, वृत्तपत्रे आदींमध्ये चीनकडून विचारांचा प्रभाव कोणत्या प्रकारे पडला जात आहे. हे देखील उदाहरणासहित स्पष्ट करण्यात आले. या दोन दिवसीय धोरणात्मक संवाद परिषदेचा अभ्यासपूर्ण अहवाल केंद्र सरकारला सादर करण्याची शिफारस यावेळी उपस्थितांनी केली.  

 चीनचे धोरण अधिक व्यापाकतेने समजून घेणे आणि त्याबाबत केवळ अभ्यासक व विद्यार्थी नाही तर सर्वांना जागरूक करणे हा ही परिषद आयोजित करण्याचा हेतू असल्याचे सेंटर फॉर चायना अनालीसिस अँड स्ट्रॅटेजीचे अध्यक्ष डॉ.जयदेव रानडे यांनी सांगितले. 

पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिरकाव, चीनकडून तंत्रज्ञानाचा होणारा वापर आदी विषय चर्चेसाठी घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.विजय खरे यांनी  सांगितले.तसेच ही दोन दिवसीय परिषद महाविद्यालयातील दोन लाख विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरूपात सहभागी होण्यासाठी उपलब्ध करून दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

-----