गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताने पटकावले चौथे स्थान
इंग्लंडमधील बाथ येथे 65 व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भारतातील 6 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताने चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने गणिताच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. देशाने आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये (International Mathematical Olympiad)चौथे स्थान मिळवून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ही भारताची १९८९ नंतरची सर्वोत्तम कामगिरी आहे. इंग्लंडमधील बाथ येथे 65 व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भारतातील 6 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताने चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले आहे.
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला आहे. ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. भारतीयं संघाने 4 सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. ही बाब इतर अनेकांना प्रेरणा देईल. तरुणांमध्ये गणित अधिक लोकप्रिय होण्यास मदत करा."