शाळेत सायकलने जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ; महाराष्ट्र मात्र पिछाडीवर

मुलींचे सायकल वापरण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. मात्र, या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्र या यादीत मागे आहे. 

शाळेत सायकलने जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ; महाराष्ट्र मात्र पिछाडीवर

एज्युवार्ता न्युज नेटवर्क 

सायकल वापरणे (riding a bicycle) आरोग्याला आणि पर्यावरणाला फायदेशीर आहे,म्हणून कित्तेक समाजसेवी संस्था सायकल वापरण्याविषयी प्रबोधन करत आहेत. या पार्श्वभूमीवर "साईलेंट रेव्युलेशन" (Silent Revelation) यांचा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, ग्रामीण भागात सायकलने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ (Rapid increase in the number of students) झाली आहे. यातही मुलींचे सायकल वापरण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. मात्र या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र (Maharashtra) या यादीत मागे आहे. 

मीडिया रीपोर्टनुसार राष्ट्रीय स्तरावर, शाळेत सायकल चालवण्याचे प्रमाण 6.6 टक्क्यांवरून 11.2 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. 2007 ते 2017 मध्ये ग्रामीण भारतात ही स्थिती जवळजवळ दुप्पट (6.3 टक्क्यांवरून 12.3 टक्के) झाली . शहरी भागात (7.8 टक्के ते 8.3 टक्के) लोकसंख्येच्या चार उप-समूहांमध्ये, ग्रामीण भागातील मुलींमध्ये सायकलिंगमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.

मुलींनी सायकल चालवण्याचे सर्वाधिक प्रमाण बिहारमध्ये वाढले आहे. इथे सायकल चालवणार्‍या मुलींच्या प्रमाणात 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पश्चिम बंगालमधील मुलींमध्ये सायकलिंगमध्ये तीन पटीने वाढ झाली आहे. आसाम, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागातील मुलींमध्ये सायकलिंगचे प्रमाण जवळजवळ दुप्पट झाली आहे. 

काही राज्यांच्या शहरी भागात मुलगा- मुलगी या दोन्हींमध्ये सायकल वापरण्याचे प्रमाण घसरले आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये ही घसरण प्रामुख्याने दिसली आहे. विशेष म्हणजे ही घट मुलांमध्ये अधिक आहे.