बोगस भरतीचे सत्र सुरूच ? चंद्रपूरनंतर कोल्हापूरात घोटाळा

निष्कलंक शिक्षण क्षेत्राला काही पैसा पिपासू लोकांमुळे कलंक लागण्याची शक्यता आहे. चंद्रपूर येथील तब्बल ५८० शिक्षक- शिक्षकेतर बोगस भरतीचा पर्दाफाश झाल्यानंतर आता कोल्हापूरच्या पवित्र भूमितून शिक्षकेतर कर्मचारी भरती घोटाळ्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे बोगस शिक्षकेतर भरतीचा पेव तर फुटला नाही ना असा प्रश्न समोर आला आहे.

बोगस भरतीचे सत्र सुरूच ? चंद्रपूरनंतर कोल्हापूरात घोटाळा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

निष्कलंक शिक्षण क्षेत्राला काही पैसा पिपासू लोकांमुळे कलंक लागण्याची शक्यता आहे. चंद्रपूर येथील तब्बल ५८० शिक्षक- शिक्षकेतर बोगस भरतीचा (Chandrapur 580 teacher-non-teaching bogus recruitment) पर्दाफाश झाल्यानंतर आता कोल्हापूरच्या पवित्र भूमितून शिक्षकेतर कर्मचारी भरती घोटाळ्याची (Non-teaching staff recruitment scam) बातमी समोर आली आहे. त्यामुळे बोगस शिक्षकेतर भरतीचा पेव तर फुटला नाही ना ? असा सवाल  उपस्थित केला जात आहे. कोल्हापूर विभागात कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनुदानित पदावर नियमबाह्य नियुक्ती (Irregular appointment to a subsidized post) आणि त्यात मोठा घोळ झाल्याचा प्रकार उच्च शिक्षण विभागाच्या निदर्शनास आला. आता या प्रकरणाची उच्च शिक्षण विभागाकडून सखोल चौकशी सुरू झाली आहे. त्यातील दोषींवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. परंतु, यावर कोणेही उघडपणे बोलण्यास तयार नाही. 

मागील काही वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र, त्यापुर्वीच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनुदानित पदावर नियुक्ती करण्याचा प्रकार कोल्हापूरात घडला आहे. चंद्रपूरात झालेल्या ५८० शिक्षक-शिक्षकेतर बोगस भरती प्रक्रियेत शिक्षणाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आहे. त्यामुळे या नियमबाह्य नियुक्तीमध्ये मोठी प्रशासकिय व राजकीय साखळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी एका-एका उमेदवाराकडून जवळपास १५ ते ३० लाख रुपये घेतले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.             

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील सुमारे ८५ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनुदानित पदावर नियमबाह्य नियुक्ती, पूर्व सेवा दाखवून त्यांची वेतन निश्चिती आणि त्यांना देय असलेली थकबाकीच्या रक्कमेबाबत अनियमितता झाली. सेवार्थ प्रणालीमध्ये जी नावे नजीकच्या काळात समाविष्ट झाली आणि पुन्हा त्यातील काही नावे कमी करण्यात आल्याचा प्रकार घडल्याची तक्रार आहे. ज्यांची नावे कमी झाली त्यापैकी काहीजणांनी त्याबाबत चौकशी करण्यासाठी आता उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे धाव घेतली आहे. 

घोळ झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर उच्च शिक्षण विभागाकडून तडकाफडकी बदली सत्र सुरू झाले. एक-दोन अधिकारी बदलून कामकाजात सुधारण होणार नाही. कारण महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींकडूनच अशा गोष्टींना बळ दिलं जात आहे. हेच अधिकारी लोक या भ्रष्टाचाराचे बीज असल्याचे अनेकदा समोर आले आहे. चौकशी करणे, निलंबन करणे या गोष्टी समोर येतात, पण पुढे काहीच होत नाही. शिक्षण विभागात मुळापासून वरपर्यंत वाळवी लागली आहे. ती काढण्याचे आव्हान सरकारपुढे आहे

...