समाजकल्याण विभागाच्या भरतीमध्ये डमी उमेदवार बसले; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप

समाजकल्याण विभाग आयुक्तालय वर्ग 3 या पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार होत आहेत. या परीक्षेसाठी डमी उमेदवार बसवणे, तोच डमी उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पाठवणार असे समजले आहे आणि जॉईन होताना दुसरा जॉईन होणार.

समाजकल्याण विभागाच्या भरतीमध्ये डमी उमेदवार बसले; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

समाजकल्याण विभाग आयुक्तालय (Social Welfare Department Recruitment) वर्ग 3 या पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार (Malpractices in the recruitment process) होत आहेत. या परीक्षेसाठी डमी उमेदवार (Dummy candidate in the exam) बसवणे, तोच डमी उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पाठवणार असे समजले आहे आणि जॉईन होताना दुसरा जॉईन होणार. एवढी मजल या पेपर फोडणाऱ्यांची झाली आहे, असा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination Coordination Committee) केला आहे. 

समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील २१९ विविध पद/जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ४ मार्च २०२५ पासून राज्यातील विविध ५६ केंद्रावर ऑनलाइन परीक्षा सुरू झालेल्या आहेत. १९ मार्च २०२५ पर्यंत या ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहेत. दरम्यान स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर आक्षेप घेतलेला आहे. या भरती प्रक्रियेत अनेक गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप ही त्यांनी केला. या परीक्षेतील गैरप्रकारावर समाज कल्याण विभागाने बारकाईने लक्ष द्यावे. विशेष करून लातूर, धुले, नंदुरबार जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर अधिकचे लक्ष केंद्रीत करावे, असे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर म्हणाले आहेत. 

समाजकल्याण आयुक्तालय वर्ग ३ या पदांची भरती सध्या सुरू आहे. यात गैरप्रकार होत आहेत हे आम्हाला आमच्या सूत्रांकडून समजले आहे. लातूर, धुळे आणि नंदुरबार येथील सेंटर मॅनेज असून इथे सर्रास गैरप्रकार सुरू आहेत असे समजले आहे. तलाठी भरती मध्ये पण लातूर येथील सेंटर मॅनेज होते. एका सेंटर वरून २०० तलाठीची गैरप्रकार करून निवड झाली आहे. यात आम्ही गुन्हा पण नोंद केला पण पोलीस तपास करत नाहित. यावरून सिद्ध होते की यात खूप मोठे- मोठे मासे आहेत. आता पण हेच सुरू आहे. डमी उमेदवार बसवणे, तोच डमी उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पाठवणार असे समजले आहे. आणि जॉईन होताना दुसरा जॉईन होणार. एवढी मजल या पेपर फोडणाऱ्यांची झाली आहे. असे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आपल्या एक्स या सोशल मिडिया अकाउंट वर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करून पोस्ट शेअर केली आहे. 

दिव्यांग उमेदावारांनी अर्जात नमूद केल्यानुसार स्वत:चा लेखनिक स्वत:च उपलब्ध करून घ्यावयचा आहे. कोणत्याही परिस्थितीत समाज कल्याण विभागाकडून लेखनिक उपलब्ध करून दिला जाणार नसल्याचे यापुर्वीच विभागाकडून कळवण्यात आले आहे. सदर कॉम्प्युटरबेस ऑनलाइन परीक्षा ही ४ मार्च २०२५ ते १९ मार्च २०२५ रोजी ३ सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. राज्यातील ५६ केंद्रावर दररोज साधारणपणे २२ हजार उमेदवार परीक्षेस सामोरे जात आहेत, अशी माहिती समाजकल्याण विभागाने दिली आहे.