दोन परीक्षा केंद्रावरील CTET परीक्षा रद्द, सीबीएसईकडून घेण्यात येणार पुनर्परीक्षा..
सीटीईटी परीक्षेदरम्यान उमेदवारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ही घटना बिहारमधील वैशाली जिल्ह्यात घडली. केशोपूर येथील सेंट जॉन्स अकादमी परीक्षा केंद्रावर सकाळी 9:30 वाजता सीटीईटी पेपर-२ ची परीक्षा सुरू होणार होती. एक हजाराहून अधिक उमेदवार वेळापत्रकापूर्वीच परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. मात्र, परीक्षेचा वेळ निघून गेला तरी प्रश्नपत्रिका वेळेवर न आल्याने विद्यार्थी अधिक चिंतेत पडले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
बिहार राज्यातील दोन परीक्षा केंद्रावरील केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) रद्द करण्यात आली आहे. याबाबत सीबीएसईकडून निवेदन जाहीर (CBSE statement released) करत ही माहिती दिली आहे. सीबीएसईने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीटीईटी पेपर-२ ची परीक्षा देशभरातील १ हजार ८०३ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यापैकी १ हजार ८०१ केंद्रांवर परीक्षा यशस्वीरित्या पार पडली. मात्र, बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील दोन परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेता आली नाही. अपरिहार्य परिस्थितीमुळे सेंट जॉन्स अकादमी, बारामती नगर आणि लक्ष्य इंटरनॅशनल अकादमी येथील परीक्षा रद्द (Exams cancelled at two exam centers) करण्यात आल्या. सीबीएसईने स्पष्ट केले की परीक्षा जवळजवळ पूर्णपणे यशस्वी झाली, परंतु वैशालीतील या दोन केंद्रांवरील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, ज्यामुळे तेथे परीक्षा घेण्यास मनाई घालण्यात आली. या केंद्रांवर बसणाऱ्या उमेदवारांना दुसरी संधी दिली जाईल असे आश्वासनही बोर्डाने दिले आहे. या दोन्ही केंद्रांवरील उमेदवारांच्या पुनर्परीक्षा पुढील १५ दिवसांत घेतल्या जातील. पुनर्परीक्षेची नवीन तारीख (New date of re-examination) आणि वेळ अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांना स्वतंत्रपणे कळवली जाईल, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - NEET UG : नीट यूजी परीक्षेसाठी आजपासून नोंदणी प्रक्रिया सुरू, 'या' तारखेपर्यंत मुदत
जेव्हा महत्त्वाच्या परीक्षेत गैरव्यवस्थापनाचा सामना करावा लागतो तेव्हा उमेदवारांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. बिहारमध्ये परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. सीटीईटी परीक्षेदरम्यान उमेदवारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ही घटना बिहारमधील वैशाली जिल्ह्यात घडली. केशोपूर येथील सेंट जॉन्स अकादमी परीक्षा केंद्रावर सकाळी 9:30 वाजता CTET पेपर-2 परीक्षा सुरू होणार होती. एक हजाराहून अधिक उमेदवार वेळापत्रकापूर्वीच परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. परंतु परीक्षेचा वेळ निघून गेला तरी प्रश्नपत्रिका वेळेवर न आल्याने विद्यार्थी अधिक चिंतेत पडले. सकाळी ११ वाजेपर्यंत प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोहोचल्या नव्हत्या नाही. आणि विद्यार्थ्यांना याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही. त्यामुळे तासन तास वाट पाहिल्यानंतर उमेदवारांचा संयम सुटला. त्यानंतर परीक्षा केंद्रावरील तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आणि गोंधळ उडाला.
परीक्षेला झालेल्या विलंबामुळे नाराज उमेदवारांनी शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनावर गंभीर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र सोडले आणि रस्त्यावर निषेध करण्यास सुरुवात केली आणि घोषणाबाजी केली. परिस्थिती बिकट होत असल्याचे पाहून स्थानिक पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अधिकारी प्रश्नपत्रिका घेऊन येईपर्यंत उमेदवारांनी परीक्षा देण्यास नकार दिला होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात परीक्षेवर बहिष्कार टाकला. परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी जवळच्या पोलिस ठाण्यांमधून अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले.