सीबीएसई बारावी निकाल जाहीर; ८५.२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींनी मुलांना टाकले मागे
यावर्षी बारावी परीक्षेसाठी १८ लाख ५७ हजार ५१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १५ लाख ७ हजार १०९ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. विभागनिहाय निकालात तिरुवनंतपुरम विभागाने ९५.६२ टक्के निकालासह देशात पहिले स्थान पटकावले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज दि. १३ मे रोजी दुपारी इयत्ता १२ वीच्या मुख्य परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला. यावर्षी एकूण ८५.२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण (85.2 percent of students passed) झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात ३.१९ टक्के घसरण (A 3.19% decline this year) नोंदवली गेली असली आहे. मात्र, मुलींनी मुलांच्या तुलनेत पुन्हा एकदा सरस कामगिरी केली आहे. मुलींचा उत्तीर्णता (Girls' results are higher) दर मुलांपेक्षा ६.७३ टक्क्यांनी जास्त आहे.
यावर्षी बारावी परीक्षेसाठी १८ लाख ५७ हजार ५१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १५ लाख ७ हजार १०९ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. विभागनिहाय निकालात तिरुवनंतपुरम विभागाने ९५.६२ टक्के निकालासह देशात पहिले स्थान पटकावले आहे. त्यानंतर चेन्नई (९३.८४%) आणि बेंगळुरू (९३.१९%) विभागांचा क्रमांक लागतो. पुणे विभागाचा निकाल ८७.३२ टक्के इतका राहिला असून, विभागनिहाय क्रमवारीत पुणे दहाव्या स्थानावर आहे.
यंदा सीबीएसईने एक महत्त्वाचा बदल केला. प्रथमच मोठ्या प्रमाणावर ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीचा वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ९८ लाख ६६ हजार ६२२ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यात आले. यामुळे गुण बेरीज, नोंदणी किंवा मूल्यांकनातील मानवी चुका पूर्णपणे टाळता आल्या असून, निकाल प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान झाली आहे.
विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी खालील अधिकृत संकेतस्थळांना भेट द्या...
https://www.cbse.gov.in/
http://www.results.nic.in/
https://results.digilocker.gov.in/
https://umang.gov.in/
तसेच डिजीलॉकर आणि उमंग मोबाईल अॅप्सद्वारे विद्यार्थी आपले गुणपत्रक, प्रमाणपत्रे आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे सहज डाऊनलोड करू शकतात.सीबीएसईने यंदा डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठा वापर करत निकाल प्रक्रिया अधिक विश्वासार्ह बनवण्याचा प्रयत्न केला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी, काही विभागांमध्ये अपेक्षेप्रमाणे निकाल न आल्याने निराशाही व्यक्त केली जात आहे.