CBSC : दहावीप्रमाणे बारावीचीही परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार ? 

एका अहवालानुसार, २०२६ मध्ये होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या १२वीच्या परीक्षेत सुमारे २० लाख विद्यार्थी बसण्याची अपेक्षा आहे, बोर्डाने म्हटले आहे की या विद्यार्थ्यांची परीक्षा सध्याच्या अभ्यासक्रमानुसार घेतली जाईल. ही परीक्षा २०२६ मध्ये १७ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि ४ एप्रिल रोजी संपेल.

CBSC : दहावीप्रमाणे बारावीचीही परीक्षा वर्षातून दोन वेळा होणार ? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education) CBSE पुढील वर्ष २०२६-२०२७ पासून वर्षातून दोनदा दहावीच्या परीक्षा घेणार आहे. याअंतर्गत, पहिल्यांदाच दहावीची परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेतली जाईल आणि दुसऱ्यांदा ही परीक्षा मे महिन्यात घेतली जाईल. दरम्यान, 12 वीच्या परीक्षा पण वर्षातून दोनवेळा होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र सध्या CBSE बोर्डाने 12 वीच्या परीक्षा पॅटर्नमध्ये कोणताही बदल केलेला नाही. (The board has not made any changes in the 12th exam pattern) या परीक्षा अजूनही जुन्या पद्धतीने म्हणजेच वर्षातून एकदा घेतल्या जातील.
या परीक्षा मागील वर्षीप्रमाणे फेब्रुवारीमध्ये घेतल्या जातील. एका अहवालानुसार, २०२६ मध्ये होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षेत सुमारे २० लाख विद्यार्थी बसण्याची अपेक्षा आहे, बोर्डाने म्हटले आहे की, या विद्यार्थ्यांची परीक्षा सध्याच्या अभ्यासक्रमानुसार घेतली जाईल. ही परीक्षा २०२६ मध्ये १७ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि ४ एप्रिल रोजी संपेल. त्यामुळे, सध्या अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जुन्या पद्धतीनुसारच परीक्षांची तयारी करावी लागेल. 
10 वीच्या परीक्षेसंदर्भात बोर्डाने दिलेल्या अपडेट नुसार   पहिल्या टप्प्यातील परीक्षा १७ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२६ या कालावधीत घेतल्या जातील. त्याच वर्गासाठी दुसरा टप्पा ५ मे ते २० मे २०२६ पर्यंत नियोजित करण्यात आला आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील परीक्षेचा निकाल २० एप्रिल २०२६ पर्यंत जाहीर होण्याची अपेक्षा आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेचा निकाल ३० जून २०२६ पर्यंत जाहीर केला जाईल.

नवीन परीक्षा पद्धतीनुसार, विद्यार्थी इच्छित असल्यास एक किंवा दोनदा परीक्षेला बसू शकतात. जर त्यांनी दुसरा प्रयत्न करण्याचा पर्याय निवडला, तर त्यांना असे विषय वगळण्याची लवचिकता असेल ज्यामध्ये ते त्यांच्या आधीच्या गुणांवर समाधानी आहेत. दोन्ही प्रयत्नांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणपत्रिका तयार केली जाईल. याशिवाय मंडळाकडून पुरवणी परीक्षेसारखी  कोणतीही विशेष परीक्षा आयोजित केली जाणार नाही.