१४ वर्षीय विद्यार्थीनीवर शाळेतून घरी जाताना अत्याचार, पोटदुखीमुळे दवाखान्यात नेले, बाळाला जन्म दिला

पीडित मुलगी आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. ती बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील एका शाळेत शिकत होती. घटनेच्या दिवशी शाळेतून घरी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिला ‘गावात सोडतो’ असे म्हणून फूस लावली.

१४ वर्षीय विद्यार्थीनीवर शाळेतून घरी जाताना अत्याचार, पोटदुखीमुळे दवाखान्यात नेले, बाळाला जन्म दिला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

बीड जिल्ह्यातून (Beed Crime News) धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. आष्टी तालुक्यातील अंभोरा परिसरात शाळेतून घरी परतत असलेल्या १४ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार (Sexual assault on a 14-year-old girl student) करण्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वर्षभरापूर्वी घडलेल्या या घटनेचा पर्दाफाश (Truth revealed after delivery) मुलीच्या प्रसूतीनंतर झाला. दोन दिवसांपूर्वी त्या मुलीला तीव्र पोटदुखीने हैराण झाल्याने अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिने एका बाळाला जन्म (Gave birth to a baby) दिला. प्रसूतीवेळी डॉक्टरांच्या तपासणीत मुलीवर पूर्वी अत्याचार झाल्याचे समोर आले. या प्रकरणी गुरुवारी अंभोरा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. ती बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील एका शाळेत शिकत होती. घटनेच्या दिवशी शाळेतून घरी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिला ‘गावात सोडतो’ असे म्हणून फूस लावली. तिचे डोळे पट्टीने बांधून रस्त्यालगतच्या जागी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. भीतीमुळे मुलीने ही घटना कुटुंबीयांना किंवा इतर कोणालाही सांगितली नव्हती.

प्रसूतीनंतर डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर अंभोरा पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ६५(१) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कलम ४ व ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, मुलीने इतके दिवस गप्प का राहिली, तिला धमकावण्यात आले होते का, कुटुंबाला याची माहिती का नव्हती, यासह सर्व बाबींचा तपास केला जात आहे. आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे साहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत हिंगे यांनी स्पष्ट केले.

ही घटनेमुळे ग्रामीण भागातील शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. महामार्गालगतच्या शाळांमधून पायी परतणाऱ्या विद्यार्थिनींसाठी योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याचे चित्र समोर आले आहे. पोलिस तपासात आरोपीचा लवकरात लवकर शोध लागावा आणि न्याय प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा पीडित कुटुंब आणि स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.