केंद्रीय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया 'या' तारखेपासून सुरू

केंद्रीय विद्यालय संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, पहिलीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे किमान वय ६ वर्षे असावे. याशिवाय बाल वाटिका-१, २ आणि ३ मध्ये प्रवेशासाठीचे वय अनुक्रमे ३ ते ४ वर्षे, ४ ते ५ वर्षे आणि ५ ते ६ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

केंद्रीय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया 'या' तारखेपासून सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची वाट पाहणाऱ्या पालकांसाठी एक महत्वाची  बातमी आहे. केंद्रीय विद्यालय संघटनने  (Kendriya  Vidyalaya Sangathan) प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना प्रसिद्ध केली आहे. (admission notice been released) त्यानुसार, इयत्ता पहिली आणि बाल वाटिकेच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज ७ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होतील आणि २१ मार्च रोजी रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील.

केंद्रीय विद्यालय संघटनेने प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेनुसार, पहिलीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे किमान वय ६ वर्षे असावे. याशिवाय बाल वाटिका-१, २ आणि ३ मध्ये प्रवेशासाठीचे वय अनुक्रमे ३ ते ४ वर्षे, ४ ते ५ वर्षे आणि ५ ते ६ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

केव्ही मध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला https://kvsangathan.nic.in ला भेट द्यावी लागेल. इयत्ता पहिली आणि बाल वाटिका १ आणि २ च्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज ७ मार्चपासून सकाळी १० वाजता सुरू होतील. या वर्गांसाठी अर्ज २१ मार्च रोजी रात्री १० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. वर्गात निवड झालेल्या उमेदवारांची पहिली यादी आणि प्रतीक्षा यादी २५ मार्च रोजी प्रसिद्ध केली जाईल. बाल वाटिकेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी २६ मार्च रोजी प्रसिद्ध केली जाईल. के व्ही प्रवेशासाठी दुसरी यादी २ एप्रिल रोजी प्रसिद्ध केली जाईल, (पहिल्या यादीनंतर जागा रिक्त राहिल्यास) बाल वाटिकेत जागा रिक्त राहिल्यास, अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी दुसरी अधिसूचना ७ एप्रिल रोजी जारी केली जाईल. अशा विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ८ एप्रिलपासून सुरू होईल. बाल वाटिका-२ आणि वर्ग-२ आणि यासारख्या इतर वर्गांमध्ये प्रवेश दिला जाईल.
केंद्रीय विद्यालय संघटनने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, वर्ग-२, बाल वाटिका-२ आणि इतर वर्गांमध्ये प्रवेश प्रक्रिया २ एप्रिलपासून सुरू होईल आणि ११ एप्रिलपर्यंत चालेल. तथापि, ज्या वर्गांमध्ये जागा रिक्त आहेत. त्या वर्गांमध्येच प्रवेश घेतला जाईल. बाल वाटिका-२, वर्ग-२ आणि इतर वर्गांमध्ये प्रवेशासाठी पहिली यादी १७ एप्रिल रोजी प्रसिद्ध केली जाईल. अकरावी वगळता सर्व वर्गांमध्ये प्रवेशाची अंतिम तारीख ३० जून असेल. जर ३० जूननंतर जागा रिक्त राहिल्या तर विशेषाधिकारप्राप्त मुलांना प्राधान्यक्रमाने निर्धारित मर्यादेवर म्हणजेच ४० जागांवर प्रवेश दिला जाईल.