एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education) CBSE जाहीर केलेल्या २०२५ च्या बोर्ड परीक्षांच्या निकालांनंतर, जर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांवर असमाधान असेल तर त्यांना आणखी एक संधी दिली जात आहे. सीबीएसईने २०२५ च्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांनंतर पुनर्मूल्यांकन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. (Schedule for revaluation process announced) जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल की त्याचे गुण योग्यरित्या दिले गेले नाहीत, तर तो दिलेल्या वेळेत स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिका मिळविण्यासाठी, गुणांची पडताळणी करण्यासाठी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतो.
सीबीएसई बारावीचे विद्यार्थी २१ मे ते २७ मे २०२५ पर्यंत स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिकांसाठी प्रत्येक विषयासाठी ७०० रुपये शुल्क आकारून अर्ज करू शकतात. त्यानंतर ते २८ मे ते ३ जून २०२५ पर्यंत गुण पडताळणी (प्रति उत्तरपत्रिका ५०० रुपये) आणि पुनर्मूल्यांकन (प्रति प्रश्न १०० रुपये) साठी अर्ज करू शकतात.
तसेच सीबीएसई दहावीचे विद्यार्थी २७ मे ते २ जून २०२५ या कलावधीत स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिकांसाठी प्रत्येक विषयासाठी ५०० रुपये शुल्क आकारून अर्ज करू शकतात. यानंतर, तुम्ही ३ जून ते ७ जून २०२५ पर्यंत पडताळणी आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. या कालावधीत, पडताळणीसाठी ५०० रुपये आणि प्रत्येक प्रश्नाच्या पुनर्मूल्यांकनासाठी १०० रुपये शुल्क निश्चित केले आहे.
अर्ज कसा करायचा?
* होम पेजवर दिलेल्या “पुनर्मूल्यांकन आणि पुनर्पडताळणी” लिंकवर क्लिक करा.
* यानंतर तुम्हाला स्वतःची नोंदणी करावी लागेल.
* आता तुम्हाला तुमच्या खात्यात लॉग इन करावे लागेल.
* यानंतर तुम्हाला अर्ज भरावा लागेल आणि अर्ज शुल्क जमा करावे लागेल.
* तुम्हाला सबमिट वर क्लिक करावे लागेल आणि पेज डाउनलोड करावे लागेल.
* भविष्यातील संदर्भासाठी या पानाची प्रिंटआउट घ्या.