"कास्ट मॅटर"  पुस्तकाचे लेखक डॉ. सुरज एंगडे यांनी विद्यार्थ्यांना काय दिला कानमंत्र

संगत आणि पंगत हाच यशस्वी जीवनाचा मूलमंत्र असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या विचारधारेशी संगत ठेवली पाहिजे.

"कास्ट मॅटर"  पुस्तकाचे लेखक डॉ. सुरज एंगडे यांनी विद्यार्थ्यांना काय दिला कानमंत्र

जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर संगत आणि पंगत ही चांगल्या विचारांची असली पाहिजे, किंबहुना संगत आणि पंगत हाच यशस्वी जीवनाचा मूलमंत्र असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या विचारधारेशी संगत ठेवली पाहिजे. तसेच  जाती-धर्माच्या चक्रविहात न अडकता स्वतःचे अस्तित्व निर्माण करायला हवे, असा कानमंत्र हार्वर्ड विद्यापीठातील स्कॉलर, "कास्ट मॅटर"  Cast Matter book या जग विख्यात पुस्तकाचे लेखक तसेच समाज कल्याण विभागाच्या परदेश शिष्यवृत्तीचे लाभार्थी जागतिक व्याख्याते डॉ. सुरज एंगडे dr. Suraj Yengde यांनी दिला .
       समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. डॉ. प्रशांत नारनवरे prashant narnavare यांच्या संकल्पनेतून राज्यात “सामाजिक न्याय पर्व” हा उपक्रम राबविण्यात येत असून त्या अंतर्गत पुणे येथील शासकीय वसतिगृहात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी एंगडे यांनी संवाद साधला यावेळी  ते बोलत होते, कार्यक्रमास  समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळुंकी, उपायुक्त विजयकुमार गायकवाड, सहायक आयुक्त निशादेवी बंडगर यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी, गृहपाल, कर्मचारी तसेच पुणे शहरातील सर्व शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 विद्यार्थी दशेमध्ये असताना विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्तीवर भर दिला पाहिजे, कोणतेही कार्य किंवा शिक्षण यामध्ये संशोधनाची सांगड घालने अत्यंत महत्त्वाचे आहे, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना कला, कृति, विचार व प्रश्न विचारण्याची सवय या गोष्टींना देखील तितकेच प्राधान्य दिले पाहिजे असेही डॉ एंगडे यांनी यावेळी सांगितले.

        डॉ. सुरज एंगडे म्हणाले , शिक्षणाबरोबरच नवीन संशोधन वृत्ती आत्मसात करा , तंत्रज्ञानाचा उपयोग कौशल्य विकसित करण्यासाठी करा, स्वतःला  घडवा व त्यातून इतरांना घडवा तरच कुटुंब व समाज घडेल. त्यातून विवेकवादी आदर्श निर्माण होतील .
         वसतिगृहातील कार्यक्रमानंतर समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती चा लाभ घेत असलेल्या जगातील विविध शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील  सुरज एंगडे यांनी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधला.

     आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय पर्व अंतर्गत राबविण्यात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांचा परिपूर्ण वापर करून त्यातून नवसमाज घडवण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा, असा आशावाद यावेळी व्यक्त केला.