महाराष्ट्रात वसुंधरा संवर्धनासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक 22 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत निसर्गाच्या पंचमहाभूतांच्या म्हणजेच भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या घटकांपैकी किमान एका घटकावर दररोज काम करण्यात येणार यावे असे शासनामार्फत सांगण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात वसुंधरा संवर्धनासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

जागतिक वसुंधरा दिन (World Earth Day) म्हणजे दि. 22 एप्रिल 2025 ते महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) दि. 1 मे 2025 या कालावधीत राज्यातील विभागीय, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत व नागरी स्थानिक संस्था पातळीवर पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण (Conservation and protection of the environment) करण्यासाठी विविध कार्यक्रम (Various programs) आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे ब्रीदवाक्य ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ (Save the environment, beautify the planet) असे राहणार आहे.

दिनांक 22 एप्रिल ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत निसर्गाच्या पंचमहाभूतांच्या म्हणजेच भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या घटकांपैकी किमान एका घटकावर दररोज काम करण्यात येणार यावे असे शासनामार्फत सांगण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सध्या घडत असलेले वातावरणातील बदलांमागची कारणे नागरिकांना समजावून सांगून एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनी वैयक्तिकरित्या अथवा सामूहिकरीत्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी एक पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे वातावरणातील हे बदल काही अंशी कमी होण्यास मदत होऊ शकणार आहे. वसुंधरेचे संरक्षण व संवर्धन हे उद्दिष्ट ठेऊन शाळा व कॉलेजमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे असेही शासनाने आपल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन

22 एप्रिल ते 24 एप्रिल 2025 या तीन दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नदी, ओढे, नाले, तलाव व समुद्र किनारे यांची स्वच्छता करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी आणि विविध सामाजिक संस्थेचा समावेश असणार आहे.

दि. 25 ते 27 एप्रिल 2025 या तीन दिवशी Reduce-Reuse-Recycle यावर आधारित विविध प्रयोगांचे आयोजन शाळा, महाविद्यालय, विविध शैक्षणिक संस्थांमध्ये व इतर ठिकाणी करण्यात येणार आहे. या प्रयोगांमधून सर्वोत्तम तीन प्रयोगांची म्हणजेच उमेदवारांची निवड करून त्यांचा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावर प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

दि. 28 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ या ब्रीद वाक्यानुसार पर्यावरणाशी अनुषंगिक एक ब्रीदवाक्य बाबतचे अभियान स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. प्राप्त होणाऱ्या ब्रीदवाक्यांमधून तीन उत्कृष्ट ब्रीद वाक्य निवडण्यात येणार आहे. तसेच निवड केलेल्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित देखील करण्यात येणार आहे. याबरोबरच सदर ब्रीदवाक्य येत्या वर्षात पर्यावरण विषयक विविध कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून हे तीन  ब्रीदवाक्य राज्याच्या पर्यावरण दिनाच्या विविध जाहिरात फलकातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी दर्शवण्यात देखील येणार आहेत.

दि. 22 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करून निवड केलेल्यांचा सन्मान 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार असून एक मे रोजी प्रदूषण मुक्त महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे.