UGC अध्यक्षांची नवी घोषणा : ७५ टक्के गुण मिळवणाऱ्या पदवी धारकांना थेट पीएच.डी.ला प्रवेश 

पीएचडीच्या प्रवेशासाठी उच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांना आता चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमात किमान ७५ टक्के गुण किंवा समतुल्य श्रेणी मिळवावी लागेल.

UGC अध्यक्षांची नवी घोषणा : ७५ टक्के गुण मिळवणाऱ्या पदवी धारकांना थेट पीएच.डी.ला प्रवेश 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम (Four year undergraduate course)जे विद्यार्थी करत आहेत किंवा करणार आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते विद्यार्थी थेट पीएचडीला प्रवेश (Direct entry to Ph.D)घेऊ शकणार आहे. शिवाय यूजीसी नेटसाठीही अर्ज करू शकणार आहे. यासाठी त्यांना आता पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्याची गरज भासणार नाही,असे माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम . जगदीश कुमार (Chairman of University Grants Commission M. Jagdish Kumar)यांनी दिली.

 विद्यापीठ अनुदान आयोग (UGC ) ने त्यात एक अट ठेवली आहे.  पीएचडीच्या प्रवेशासाठी उच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांना आता चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमात किमान ७५ टक्के गुण किंवा समतुल्य श्रेणी मिळवावी लागेल. ही प्रणाली या वर्षीपासून लागू केली जाईल, अशी माहिती  UGC  अध्यक्ष प्रोफेसर एम जगदीश कुमार यांनी आपल्या X अकौंटवरून  दिली आहे.

हेही वाचा : UGC NETपरीक्षेत मोठे बदल ;बॅचलर डिग्रीच्या विद्यार्थ्यांना देता येणार परीक्षा; एम.जगदीश कुमार यांची घोषणा

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढवण्यासाठी  UGC ही महत्त्वाची पावले उचलली आहेत. SC, ST, OBC (नॉन-क्रिमी लेयर), अपंग आणि EWS विद्यार्थ्यांना देखील पीएचडी प्रवेशामध्ये पाच टक्के किंवा त्याच्या समतुल्य श्रेणीची सूट मिळेल. यामुळे चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी आता थेट UGC NET साठी अर्ज करू शकणार आहेत. यामध्ये, चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असणारे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतील.

दरम्यान, चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयोगाने आणखी एक मोठा दिलासा दिला आहे. UGC NET साठी, त्यांना विषयाच्या आवश्यकतेतून सूट देण्यात आली आहे. म्हणजेच आता तो कोणताही विषय निवडू शकणार आहे. यापुढे त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले विषय निवडणे बंधनकारक असणार नाही. मात्र, पीएचडी साठी अर्ज करतानाच त्यांना त्यासाठीचे विषय ठरवावे लागणार आहेत.