तलाठी भरती वरील स्टे कोर्टाने उठवला, पुढील प्रक्रिया लवकरच...
पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांमधील पद भरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने १३ जिल्ह्यांमधील पदांबाबत निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
तलाठी भरती (Talathi Recruitment) वरील स्टे कोर्टाने उठवला (The court lifted the stay) आहे. त्यामुळे तलाठी भरतीचा पुढील टप्पा लवकरच सुरु होणार आहे. मात्र, पेसा क्षेत्रातील (Area of employment) जिल्ह्यांमधील पद भरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल झाल्याने १३ जिल्ह्यांमधील पदांबाबत निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
आदिवासीबहुल अर्थात पेसा क्षेत्रातील तलाठी पदांची नियुक्ती निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली आहे. निवडणूक आयोगाने तूर्तास लाल कंदील दाखवला आहे. मात्र, अन्य २३ जिल्ह्यांमध्ये एक हजारांहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती झाली. गेल्या वर्षी जूनमध्ये ४ हजार ४६६ जागांसाठी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली.
२३ जिल्ह्यांमधील २ हजार ४७९ निवड झालेल्या उमेदवारांपैकी १ हजार ४४९ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली होती. त्यातील १ हजार ४४ उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. सर्वाधिक १४१ तलाठी रायगड जिल्ह्यात, त्याखालोखाल ११३ सोलापूर जिल्ह्यामध्ये, वर्धा येथे ६३, नागपूरमध्ये ५३ आहेत. अमरावती, यवतमाळ, पालघर, गडचिरोली, पुणे, नगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, चंद्रपूर, नांदेड व ठाणे या जिल्ह्यांमधील १ हजार ७०३ उमेदवारांची नियुक्ती रखडली आहे.