"मैं टिचर हूं, कुछ भी कर सकता हूं" म्हणत विद्यार्थिनीचा 'क्लास रूम' मध्ये विनयभंग

लातूर शहरातून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. "मै टिचर हू कुछ भी कर सकता हू" अशी मग्रूरीची भाषा वापरत एका खाजगी कोचिंग शिक्षकाने एकट्यापणाचा फायदा घेत एका विद्यार्थीचा क्लासरूममध्येच विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

"मैं टिचर हूं, कुछ भी कर सकता हूं" म्हणत विद्यार्थिनीचा 'क्लास रूम' मध्ये विनयभंग

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

लातूर शहरातून शिक्षण (latur crime news) क्षेत्राला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. "मै टिचर हू कुछ भी कर सकता हू" अशी मग्रूरीची भाषा वापरत एका खाजगी कोचिंग शिक्षकाने (Private coaching teachers) एकटेपापणाचा फायदा घेत एका विद्यार्थीचा क्लासरूममध्येच विनयभंग (Molestation of a female student) केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे (Fear among parents) वातावरण निर्माण झाले आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिडित विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे क्लासला गेली होती. क्लासमध्ये विद्यार्थिनी एकटी असल्याचा शिक्षकाने गैरफायदा घेत तिचा विनयभंग केला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे विद्यार्थिनी प्रचंड घाबरून गेली. घाबरलेल्या आवस्थेत घरी आलेल्या विद्यार्थिनी तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी तत्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत संबंधित क्लास शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी घटनेची गंभीरता लक्षात घेत आरोपी ट्यूशन शिक्षकाविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाणे लातूर येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू असून आरोपीकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून शिक्षणाची पंढरी असलेल्या लातूर शहरात शिक्षणाच्या नावाखाली मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः खासगी क्लासेसमध्ये जाणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ट्यूशन क्लासेस, खासगी शिकवण्या आणि शिक्षण संस्थांवर अधिक कठोर नजर ठेवण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. पोलिसांकडूनही नागरिकांना अशा प्रकारची कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.