शाळकरी मुलाची मित्रांनीच केली धारदार शस्त्राने हत्या
लातूरच्या औसा तालुक्यातील कमालपूर शिवारात शाळकरी मुलाची त्याच्याच मित्राने धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मृत मुलाच्या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनीवर होणाऱ्या अत्याचाराने कळस गाठला आहे. त्यातच आता लातूरच्या (Latur School Student Crime) औसा तालुक्यातील कमालपूर शिवारात शाळकरी मुलाची त्याच्याच मित्राने धारदार शस्त्राने वार करून हत्या (School boy murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मृत मुलाच्या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रितेश रवींद्र गिरी (वय १४) असे मयत मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश व त्याचे इतर दोन मित्र रोजच्या प्रमाणे सकाळी एकत्र आले. त्यानंतर ते विजय विठ्ठल गिरी यांच्या शेतात गेले. रितेश रवींद्र गिरी हा देखील या मुलांसोबत शेतात गेला. मात्र, रात्र झाली तर रितेश घरी परतला नाही म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला इकडे तिकडे रात्रभर शोधले तरी त्याला काहीच पत्ता लागत नव्हता. त्यानंतर मृत रितेशच्या आई-वडिलांनी भादा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी ताबडतोब तपासाची सुत्रे फिरवली आणि सोबत असलेल्या मित्रांची विचारणा केल्यानंतर त्यातील एकाने घटनेची सर्व माहिती दिली.
घटनेची माहिती देताना मृत रितेशच्या मित्राने सांगितले की, रितेश गिरी याला आम्हीच जिवे मारून त्याचा मृतदेह सोयाबीनच्या ढिगाऱ्याखाली पुरला आहे. अशी माहिती आरोपी मुलाने भादा पोलिसांना दिली. हे ऐकून कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी विजय गिरी यांच्या शेतातील सोयाबीनच्या ढिगाऱ्याकडे धाव घेतली. पोलिस देखील ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. सोयाबीनचा ढिगार बाजूला केल्यानंतर रितेश गिरी य शाळकरी मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखम आढळून आल्या आहेत.